करमाळा प्रतिनिधी एकादशीच्या दिवशी मुस्लिम समाजाची बकरी ईद येत असल्यामुळे मुस्लिम समाजाने आषाढी एकादशीच्या दिवशी कुर्बानी न करता दुसऱ्या दिवशी कुर्बानी करून संपूर्ण महाराष्ट्रात एक आदर्श निर्माण करावा असे आवाहन पुणे शहर काँग्रेस कमिटीचे शहर उपाध्यक्ष व करमाळा मुस्लिम समाजाचे अध्यक्ष हाजी उस्मानशेठ तांबोळी यांनी केले आहे संपूर्ण महाराष्ट्राचं दैवत पंढरपूरला पांडुरंगाची आषाढी एकादशीच्या दिवशी मोठी यात्रा असते आणि ह्या वारीला वारकरी महाराष्ट्रातुन पंधरा ते वीस दिवसांपासून पायी चालत आप आपल्या दिंडीत मोठया भक्तिभावाने पंढरपूर ला विठ्रठलाच्या दर्शनासाठी जातात आणि समाजाची बांधिलकी म्हणून सर्वधर्म समभावाची भावना ठेवून सर्व मुस्लिम बांधवांनी बकरी ईदच्या दिवशी कुर्बानी न करता दुसऱ्या दिवशी कुर्बानी करावी व उभ्या महाराष्ट्रापुढे एक आदर्श निर्माण करावा असे हाजी उस्मानशेठ तांबोळी यांनी प्रसिद्धीसाठी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
करमाळा, प्रतिनिधी : करमाळा येथील श्री संत नामदेव शिंपी समाजाच्या वतीने श्रीसंत नामदेव शिंपी महाराज…
करमाळा प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेसचे करमाळा तालुकाध्यक्ष तथा पंचायत समिती सदस्य भरत (भाऊ) आवताडे यांच्या…
* करमाळा, प्रतिनिधी : करमाळा शहरातील शाहूनगर परिसरातील नागरिकांच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या पाणीप्रश्नाच्या निराकरणाच्या दिशेने…
करमाळा (प्रतिनिधी) – करमाळा येथील ग्रामदैवत श्रीजगदंबा कमलादेवी मंदिराच्या जतन व संवर्धनाच्या कामाला भाविकांचा उत्स्फूर्त…
करमाळा प्रतिनिधी : संजय गांधी निराधार योजनेची प्रकरणे मार्च महिन्यामध्ये मंजूर झाली होती त्यानंतर चार…
करमाळा प्रतिनिधी भाषा ही केवळ परीक्षेतील गुणांची बाब नसून विद्यार्थ्यांच्या विचारांना आकार देणारे आणि जगाशी…