करमाळा प्रतिनिधी अडीच वर्षाच्या काळात सत्तेच्या माध्यमातून कोणताही फायदा शिवसैनिकाला तथा शिवसेना मजबुती करण्यासाठी झाला नाही. मात्र येणाऱ्या काळात सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेसाठी
व शिवसैनिकांना मोठी ताकद देऊ तसेच सोलापूर जिल्ह्याचे हक्काचे पाणी अद्याप जिल्हा वासियांना यांना मिळालेले नसताना हे पाणी पुणे जिल्ह्यासाठी देत असलेल्या लाकडी- निंबोडी योजनेचा पुनर्विचार करू, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोलापुरातील शिवसैनिकांना दिला आहे.
शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे तालुका समन्वयक दीपक पाटणे, ज्येष्ठ पत्रकार नासिर कबीर, माजी शहरप्रमुख संजय शीलवंत, राजेंद्र मिरगळ, उद्योगपती श्रीकांत पवार यांनी शिंदे यांच्या ठाणे येथील निवासस्थानी भेट घेऊन त्यांचा सत्कार केला.यावेळी शिष्टमंडळाशी औपचारिक बोलताना आषाढीला मी पंढरपूरला येत असून या दिवशी फक्त शासकीय कार्यक्रम आहेत. मात्र सोलापुरातील प्रश्नासाठी मंत्रालयात स्वतंत्र बैठक लावू, असे आश्वासन दिले.
सोलापूर जिल्ह्यातील कोणताही शिवसैनिक माझ्याकडे काम घेऊन आला तर त्याला मोकळ्या हाताने परत पाठवणार नाही, असा विश्वास देऊन येणाऱ्या काळात शिवसैनिकाला ताकद देणे त्याला मजबूत करणे व त्या माध्यमातून संघटना मजबूत करणे याकडे लक्ष देणार असल्याचे सांगितले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोरोना काळात 20 लाख रुपये किमतीची रुग्णवाहिका करमाळा तालुक्यातील जनतेच्या सोयीसाठी मोफत दिली होती. या रुग्णवाहिक वाहिकेतून 372 रुग्णांना मोफत इच्छित नवीन हॉस्पिटलला हलवण्यात मदत झाली. याचाही आढावा वैद्यकीय मदत कक्षाचे समन्वयक दीपक पाटणे यांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना दिली.
करमाळा, प्रतिनिधी : करमाळा येथील श्री संत नामदेव शिंपी समाजाच्या वतीने श्रीसंत नामदेव शिंपी महाराज…
करमाळा प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेसचे करमाळा तालुकाध्यक्ष तथा पंचायत समिती सदस्य भरत (भाऊ) आवताडे यांच्या…
* करमाळा, प्रतिनिधी : करमाळा शहरातील शाहूनगर परिसरातील नागरिकांच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या पाणीप्रश्नाच्या निराकरणाच्या दिशेने…
करमाळा (प्रतिनिधी) – करमाळा येथील ग्रामदैवत श्रीजगदंबा कमलादेवी मंदिराच्या जतन व संवर्धनाच्या कामाला भाविकांचा उत्स्फूर्त…
करमाळा प्रतिनिधी : संजय गांधी निराधार योजनेची प्रकरणे मार्च महिन्यामध्ये मंजूर झाली होती त्यानंतर चार…
करमाळा प्रतिनिधी भाषा ही केवळ परीक्षेतील गुणांची बाब नसून विद्यार्थ्यांच्या विचारांना आकार देणारे आणि जगाशी…