करमाळा प्रतिनिधी :
करमाळा तालुक्यातील सर्वात मोठे जेऊर रेल्वे स्थानक आहे, या रेल्वेस्थानकावर अनेक गाड्या थांबतात परंतु हुतात्मा एक्सप्रेस, उद्यान एक्सप्रेस याही गाड्यांना या स्थानकावर थांबा मिळावा अशी मागणी विभागीय रेल्वे व्यवस्थापक सोलापुर यांच्याकडे माजी मंत्री तथा आमदार सुभाष बापू देशमुख यांच्या शिष्टमंडळाद्वारे करण्यात आली असल्याची माहिती भाजपा युवा मोर्चा प्रदेश सचिव दिपक चव्हाण यांनी दिली.याबाबत सकारात्मक चर्चा झाली असून निश्चितपणे जेऊर येथे हुतात्मा एक्सप्रेसला येत्या काही दिवसामध्ये थांबा मिळावण्यासाठ प्रयत्नशील राहू, असे मतविभागीय रेल्वे विभागीय व्यवस्थापक सोलापूर यांनी व्यक्त केले. ही गाडी थांबल्यास पुणे, मुंबई, सोलापूर जाणाऱ्या प्रवाशांची चांगली सोय होणार आहे.
करमाळा तालुक्यासह जामखेड, कर्जत, परांडा या परिसरातील प्रवाशांची सोय होणार आहे. तसेच केम येथे हैदराबाद -मुंबई व चेन्नई -मुंबई या रेल्वे गाडी ना पूर्वीचा थांबा कायम करावा अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी नरेंद्रसिंह ठाकूर व आदी मान्यवर उपस्थित होते.
करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…
करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…
करमाळा प्रतिनिधी — गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव म्हणून साजरा न करता त्याला सामाजिक बांधिलकीची…
करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…
* करमाळा प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…
करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…