राज्यातील अनेक धरणे भरत आली आहेत. मात्र अद्याप करमाळा तालुक्यातील अनेक तलाव कोरडे आहेत. निम्मा पावसाळा संपत आला आहे त्यामुळे ओहोरफ्लोच्या पाण्याने करमाळा तालुक्यातील कुकडी धरण लाभक्षेत्रात येणारे तलाव भरून घेण्यात यावेत, अशी मागणी करत वारे यांनी नगर- सोलापूर महामार्गावर रस्ता रोको आंदोलन केले होते. तेव्हा अधिकाऱ्यांनी सात दिवसाच्या आत पाणी देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार येथे पाणी आले आहे.संतोष वारे यांच्या या प्रयत्नाचे हे यश आले आहे, असे राष्ट्रवादी किसान सेलचे तालुकाध्यक्ष सचिन नलवडे पाटील यांनी सांगितले आहे.कामोणे येथे तलावात पाणी पूजन झाले तेव्हा उपसरपंच संदीप नलवडे, सोमनाथ भिसे, मधुकर जाधव, चिंटू भालेराव, औदुंबर नलवडे, अजय पवार, लक्ष्मण भालेराव, दीपक देवकते, कृष्णा भिसे, चंद्रकांत पवार, गणेश वाल्मिक शिंदे, सौरभ देमुंडे, पांडुरंग नलवडे, अशोक देवकते, तुळशीराम देमुंडे आदी यावेळी उपस्थित होते.
आदरणीय प्रा. रामदास झोळ सरांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!काही माणसं आयुष्यात फक्त भेटत नाहीत… तर आयुष्य…
करमाळा (प्रतिनिधी) – ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शालेय प्रवेशासाठी आवश्यक असणाऱ्या शासकीय दाखल्यांसाठी होणारी गैरसोय…
करमाळा प्रतिनिधी. करमाळा विधानसभा मतदारसंघात सखोल मतदार पुनर्निरीक्षण (SIR) कार्यक्रम अंतर्गत मतदार यादी अचूक करण्यासाठी…
* करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील भागवत कथा ज्ञानयज्ञ समिती व संत गजानन महाराज मंदिर समिती…
सोलापूर प्रतिनिधी शासनाच्या पगारी घेणाऱ्या सर्व शिक्षकांनी नेमणुकीच्या ठिकाणी राहणे अपेक्षित आहे असे होत नाही…
करमाळा प्रतिनिधी शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील नामांकित 'नामसाधना मॉडर्न स्कूल'…