राज्यातील अनेक धरणे भरत आली आहेत. मात्र अद्याप करमाळा तालुक्यातील अनेक तलाव कोरडे आहेत. निम्मा पावसाळा संपत आला आहे त्यामुळे ओहोरफ्लोच्या पाण्याने करमाळा तालुक्यातील कुकडी धरण लाभक्षेत्रात येणारे तलाव भरून घेण्यात यावेत, अशी मागणी करत वारे यांनी नगर- सोलापूर महामार्गावर रस्ता रोको आंदोलन केले होते. तेव्हा अधिकाऱ्यांनी सात दिवसाच्या आत पाणी देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार येथे पाणी आले आहे.संतोष वारे यांच्या या प्रयत्नाचे हे यश आले आहे, असे राष्ट्रवादी किसान सेलचे तालुकाध्यक्ष सचिन नलवडे पाटील यांनी सांगितले आहे.कामोणे येथे तलावात पाणी पूजन झाले तेव्हा उपसरपंच संदीप नलवडे, सोमनाथ भिसे, मधुकर जाधव, चिंटू भालेराव, औदुंबर नलवडे, अजय पवार, लक्ष्मण भालेराव, दीपक देवकते, कृष्णा भिसे, चंद्रकांत पवार, गणेश वाल्मिक शिंदे, सौरभ देमुंडे, पांडुरंग नलवडे, अशोक देवकते, तुळशीराम देमुंडे आदी यावेळी उपस्थित होते.
करमाळा (प्रतिनिधी) – करमाळा येथील ग्रामदैवत श्रीजगदंबा कमलादेवी मंदिराच्या जतन व संवर्धनाच्या कामाला भाविकांचा उत्स्फूर्त…
करमाळा प्रतिनिधी : संजय गांधी निराधार योजनेची प्रकरणे मार्च महिन्यामध्ये मंजूर झाली होती त्यानंतर चार…
करमाळा प्रतिनिधी भाषा ही केवळ परीक्षेतील गुणांची बाब नसून विद्यार्थ्यांच्या विचारांना आकार देणारे आणि जगाशी…
करमाळा प्रतिनिधी - मानव एकता दिनानिमित्त संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन दिल्ली शाखा करमाळा यांचे वतीने…
करमाळा प्रतिनिधी :- महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा.…
करमाळा प्रतिनिधी दिग्वीजय बागल यांची ' मूख्यमंत्री बळीराजा पाणंद/ शेत रस्ता समिती च्या करमाळा विधानसभा…