प्रेरणा मानव विकास प्रतिष्ठान “हर घर तिरंगा” हा उपक्रम राबवणार

 

करमाळा प्रतिनिधी  प्रेरणा मानव विकास प्रतिष्ठानच्या वतीने भारत देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण होत असल्याने देशभक्ती भावना कायमस्वरूपी सर्वांच्या मनात राहावी म्हणून 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या कालावधीत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे ” *हर घर तिरंगा”* हा उपक्रम राबविला जाणार आहे हा उपक्रम प्रेरणा मानव विकास प्रतिष्ठानच्या वतीने रावगाव ता. करमाळा येथे राबविण्यात येणार आहे . यावर्षी भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे होत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आव्हानानुसार “हर घर तिरंगा” हा उपक्रम देशभर राबविण्यात येणार आहे . ध्वज संहितेमध्ये काहीसे बदल करून नियमांतील शिथीलता आणून नागरिकांना उपक्रमात सहभागी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले गेले आहेत नाममात्र दरात तिरंगा ध्वज उपलब्ध व्हावा यासाठी शासनाच्या पोस्ट कार्यालयाच्या माध्यमातूनही याची व्यवस्था करण्यात आली आहे यापूर्वी ध्वजसंहिती चे नियम अत्यंत कडक होते त्याची अंमलबजावणी देखील काटेकोरपणे पाळली जात होती त्यामुळे नागरिकांच्या मनामध्ये राष्ट्रध्वजाबाबत एक प्रकारची भीती होती देशाबद्दल अभिमान असलेल्या व्यक्तींना देखील आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी तिरंगा राष्ट्रध्वज फडकवण्यापासून वंचित राहावे लागत होते काही गडबडीने एखादी चूक झाल्यास त्याचा नाहक त्रास भोगावा लागेल ही भीती दूर करण्यासाठी व चांगले वातावरण निर्माण करण्यासाठी शासनाकडून ध्वजसंहितेच्या नियमात काहीसे बदल करण्यात आलेले आहेत यामुळे आता देशभक्तीमय चांगल्या वातावरणाची सुरुवात होत आहे . यावेळी प्रेरणा मानव विकास प्रतिष्ठानच्या वतीने 500 राष्ट्र ध्वजाचे मोफत वाटप करण्यात येणार आहे . संस्थेचे अध्यक्ष रामदास कांबळे सांगितले आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळा भाजपा शहर उपाध्यक्षपदी कपिल मंडलिक यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी करमाळा शहराच्या उपाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते तथा भाजपाचे निष्ठावान…

18 hours ago

छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारूढ पुतळयाचे भूमिपूजन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते होणार – मोहिनी संजय सावंत, नगराध्यक्षा करमाळा नगर परिषद

करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…

2 days ago

जेऊरमध्ये महावितरणविरोधात बळीराजाचा एल्गार; करमाळा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली विराट धरणे आंदोलन

​जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…

2 days ago