केत्तूर ( अभय माने) भगवंताचे नामस्मरण करणे ही भक्ताची ताकद असून ,देवाचे स्मरण नामस्मरण करत रहा चिंतन करत रहा. आपले ज्या गोष्टीपासून नुकसान होणार आहे अशा गोष्टीपासून मात्र दूर राहा असे उद्गगार हभप उल्हास महाराज सूर्यवंशी (आळंदी) यांनी केत्तूर ( ता. करमाळा )येथील हरिनाम सप्ताह सप्ताहामध्ये काल्याचे कीर्तनात केले .श्रावण महिन्यात केत्तुर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात अखंड सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. सप्ताहाची सांगता उल्हास महाराज सूर्यवंशी यांचे काल्याचे किर्तनाने झाली.त्यानंतर उपस्थित भाविकांना महाप्रसादाची वाटप करण्यात आले.
अखंड हरिनाम सप्ताह काळात पांडुरंग महाराज सातपुते (भिगवन ) ,लक्ष्मण महाराज झेंडे (खातगाव ),शांतीलाल महाराज जंजीरे ( पिंपळवाडी), उमेश महाराज बागडे (आळंदी ), अनिल महाराज महाकले (आळंदी ), माऊली महाराज झोळ (वाशिंबे), दिगंबर महाराज पवार (पोफळज ) यांची कीर्तन सेवा झाली.ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताह या सप्ताहाचे व्यासपीठ चालक म्हणून योगेश महाराज घाडगे (आळंदी) व दत्तात्रय महाराज सुपेकर ( दिवेगव्हाण) यांनी काम पाहिले.सप्ताहाचे आयोजन क्रांतीसिंह पाटील यांनी केले होते.
मृदंगसाथ मध्ये मृदंगाचार्य महेश महाराज येवले यांची साथ होती.
करमाळा, प्रतिनिधी : करमाळा येथील श्री संत नामदेव शिंपी समाजाच्या वतीने श्रीसंत नामदेव शिंपी महाराज…
करमाळा प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेसचे करमाळा तालुकाध्यक्ष तथा पंचायत समिती सदस्य भरत (भाऊ) आवताडे यांच्या…
* करमाळा, प्रतिनिधी : करमाळा शहरातील शाहूनगर परिसरातील नागरिकांच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या पाणीप्रश्नाच्या निराकरणाच्या दिशेने…
करमाळा (प्रतिनिधी) – करमाळा येथील ग्रामदैवत श्रीजगदंबा कमलादेवी मंदिराच्या जतन व संवर्धनाच्या कामाला भाविकांचा उत्स्फूर्त…
करमाळा प्रतिनिधी : संजय गांधी निराधार योजनेची प्रकरणे मार्च महिन्यामध्ये मंजूर झाली होती त्यानंतर चार…
करमाळा प्रतिनिधी भाषा ही केवळ परीक्षेतील गुणांची बाब नसून विद्यार्थ्यांच्या विचारांना आकार देणारे आणि जगाशी…