मंत्रालयाशेजारी ‘शेतकरी भवन’ उभा करा ‘जनशक्ती’च्या महिला पदाधिकाऱ्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

 मुंबई प्रतिनिधी.                                                    शिवसेना भवन, काँग्रेस भवन, राष्ट्रवादी भवन, भाजप कार्यालय अशा पद्धतीने महाराष्ट्रातील प्रत्येक पक्षाला आप-आपले भवन आहे. दिल्लीला गेल्यावर महाराष्ट्रातील जनतेसाठी महाराष्ट्र भवन आहे. त्याप्रमाणे महाराष्ट्रातील शेतकरी विविध कामासाठी नेहमीच राजधानी मुंबईला जातात. मात्र तिथे या शेतकऱ्यांची राहण्याची मोठी तारांबळ उडते. आमदार निवास मध्ये नेहमीच राजकारण आडवे येते. त्यामुळे मुंबई येथे मंत्रालया लगत शेतकऱ्यांसाठी शेतकरी भवन उभा करा अशी आग्रही मागणी जनशक्ती संघटनेच्या महिला प्रदेशाध्यक्षा विनिता बर्फे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली.

आज जनशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अतुल खुपसे-पाटिल यांच्या मार्गदर्शनाखाली महिला प्रदेशाध्यक्षा विनिता बर्फे व महिला पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबई मंत्रालय येथे शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नासाठी भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांचा बुके देऊन सन्मान करण्यात आला.

दरम्यान यावेळी विनिता बर्फे यांनी मुख्यमंत्री शिंदे महाराष्ट्रामध्ये ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना मोफत वीज द्या, सर्व कारखानदारांनी उसाची थकलेली एफ आर पी द्यावी, उसाचा चालू वर्षाचा साडे तीन हजार दर द्यावा, शेतकऱ्यांना हेलपाटे ना मारता वेगवेगळ्या बँकांनी कर्ज त्वरित उपलब्ध करून द्यावे, इंग्रजी माध्यमांच्या शाळेमध्ये शेतकऱ्यांच्या मुलांना मोफत शिक्षणाचा कोटा उपलब्ध करून द्यावा या मागणीसह शेतकरी भवन उभारावे ही प्रामुख्याने मागणी करण्यात आली. या सर्व मुद्यावर चर्चा करताना मुख्यमंत्री शिंदे यांनी हे सरकार सर्वसामान्य व शेतकऱ्यांचे आहे त्यामुळे आपल्या मागण्यांचा सकारात्मक विचार करू असे सांगितले.

यावेळी वाशी शहर अध्यक्षा स्नेहा चांदोरकार, शीतल कदम, सामाजिक कार्यकर्ते डॅनी डिसोझा यांच्यासह महिला उपस्थित होत्या.

मुख्यमंत्र्यांनी केले ‘जनशक्ती’चे कौतुक
– जनशक्ती संघटनाही अत्यंत तळागाळातून निर्माण झालेली कमी वयाची संघटना आहे. असे असताना देखील या संघटनेने महाराष्ट्रभर जाळे निर्माण केले आहे ही गोष्ट कौतुकास्पद आहे. शेतकरी, एस.टी. कर्मचारी, ऊस वाहतूकदारांसाठी, कारखानदारांच्या विरोधात नेहमीच आंदोलनाचे हत्यार उपसले असल्याचे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनशक्ती संघटनेचे कौतुक केले.

saptahikpawanputra

Recent Posts

ग्रामीण विद्यार्थ्यांच्या इंग्रजी अभिव्यक्तीला जिल्हास्तरीय व्यासपीठ* *लोकशिक्षिका स्व. लीलाताई दिवेकर यांच्या स्मरणार्थ करमाळ्यात उद्या वक्तृत्व स्पर्धा

करमाळा प्रतिनिधी भाषा ही केवळ परीक्षेतील गुणांची बाब नसून विद्यार्थ्यांच्या विचारांना आकार देणारे आणि जगाशी…

7 hours ago

मानव एकता दिनानिमित्त संत निरंकारी मंडळाच्या शिबीरात १६६ जणांचे रक्तदान*

करमाळा प्रतिनिधी - मानव एकता दिनानिमित्त संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन दिल्ली शाखा करमाळा यांचे वतीने…

1 day ago

जयकुमार गोरे यांच्यावरील आक्षेपार्ह वक्तव्याचा करमाळ्यात भाजपकडून तीव्र निषेध

  करमाळा प्रतिनिधी :- महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा.…

2 days ago

नाशवंत गोष्टीकडे दुर्लक्ष करून शाश्वत गोष्टी लक्षात घेवून युवकांनी समाजकारण व राजकारणातून जनतेची सेवा करावी . – मा .आ जयवंतराव जगताप

करमाळा प्रतिनिधी दिग्वीजय बागल यांची ' मूख्यमंत्री बळीराजा पाणंद/ शेत रस्ता समिती च्या करमाळा विधानसभा…

2 days ago

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त करमाळ्यात गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

  करमाळा प्रतिनिधी : मुक्ता साळवे शैक्षणिक अभियान, करमाळा यांच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे…

2 days ago

शासकीय कामकाजाचे प्रत्यक्ष धडे! ‘नामसाधना’च्या चिमुकल्यांनी स्वतः अर्ज लिहून मांडल्या समस्या; मुख्याधिकाऱ्यांकडून कौतुक

करमाळा (प्रतिनिधी): विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांना लहानपणापासूनच दैनंदिन जीवन, प्रशासकीय कामकाज, शासकीय…

3 days ago