केत्तूर ( अभय माने) संपूर्ण करमाळा तालुक्यात बुधवारी (ता.7) रात्री वादळी वाऱ्यासह दमदार पाऊस झाला.यामुळे बहुतांश शेतकऱ्यांच्या शेतातील पिकात पाणी साठून राहिल्याने पिकाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.केत्तूर पारेवाडी रेल्वे स्टेशन येथील नवीन रेल्वे भुयारी मार्गात पाच ते सहा फूट पाणी साचून राहिल्याने व दिवसभर ते तसेच राहिल्याने शाळकरी विद्यार्थी तसेच वृद्ध व इतर नागरिकांना त्रास सहन करावा लागला तर दुचाकी चार चाकी वाहने मात्र बारा किलोमीटरचा वळसा घालून त्यांना यावे लागले. भुयारी मार्गामुळे गावाचा संपर्क मात्र तुटला होता.त्यातच रात्रभर वीज गुल राहिल्याने सर्वांना उकाडा सहन करावा लागला.
गेली 4/5 दिवसापासून सातत्याने पडत असलेल्या पावसामुळे बळीराजा कधी एकदाच पाऊस उघडतोय याची वाट पाहत आहे.दरवर्षी परतीच्या पावसाकडे येथील शेतकरी आतुरतेने वाट पाहत असतो, मात्र यावेळेस जून महिन्याच्या सुरवातीपासूनच पावसाने कमी अधिक प्रमाणात हजेरी लावली.यामुळे नजीकचे नदी, नाले, तलाव तुडूंब भरून वाहत आहेत .
असे असताना आता परतीचा पाऊस कमी होईल अशी शक्यता वाटत होती मात्र परतीचा पाऊस तर रोजच नित्यनियमाने बरसत आहे.बुधवारी रात्रभर कमी जास्त प्रमाणात ब्रेक के बाद पाऊस होत होता. यामुळे नजीकच्या वाशिंबे,पोमलवाडी, जिंती, टाकळी या परिसरातील शेतकऱयांचा डाळिंब,टोमॅटो,केळी,यासारख्या शेतातील बागांमध्ये पाणी साठून राहिल्यास पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे.तसेच शेतात तणही मोठ्या प्रमाणात वाढल्याने त्याला वेळीच काढण्याची आवश्यकता आहे.परंतु पाऊस आता थांबणार कधी याची शेतकरी वाट पाहत आहे.
खरीपातील पावसाच्या भरवश्यावरील पिके हाती लागण्याची खात्री नसली, तरी रब्बीतील पिके हमखास हाती लागत असल्याचा शेतकऱ्यांचा अनुभव आहे.आज गुरुवारी दिवसभरही पावसाची रिमझिम चालूच होती
करमाळा प्रतिनिधी: अमरावती येथे सुरू असलेल्या ३४ व्या ज्युनियर राज्य फेंसिंग अजिंक्यपद स्पर्धा २०२६ मध्ये…
करमाळा प्रतिनिधी: गेल्या दोन-तीन वर्षांपासून शेतकरी वर्ग सातत्याने अस्मानी आणि सुलतानी संकटांचा सामना करत आहे.…
करमाळा प्रतिनिधी बैलपोळा हा केवळ बैलांच्या पूजनाचा सण नसून, कृषीसंस्कृती, पशुप्रेम, कृतज्ञता आणि भारतीय परंपरेतील…
* करमाळा प्रतिनिधी : श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त करमाळा येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या…
करमाळा प्रतिनिधी गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा, सामाजिक एकोपा आणि सांस्कृतिक परंपरेचा उत्सव म्हणून साजरा होत…
करमाळा प्रतिनिधी : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जन्माचे ७५० वे वर्ष राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरे…