गेल्या दहा दिवसाच्या पाहूनचारानंतर लाडक्या बाप्पांनी शुक्रवारी निरोप घेतला. श्री गणेश चतुर्थीला मोठ्या आनंदात उत्साहात व जल्लोषात भाविकांनी गणरायाचे आगमन केले त्यावेळी असणारा तोच आनंद आणि उत्साह गणेश भक्तांच्या चेहऱ्यावर विसर्जनाच्या यावेळी दिसून येत होता.केत्तूर (ता. करमाळा) येथील श्री किर्तेश्वर तरुण मंडळाने गुरुवारी तर सुयश स्पेशल गाईडन्स, हनुमान मित्र मंडळ , बजरंग मित्र मंडळ व इतर बाल गणेश मंडळांनी शुक्रवारी गणरायाचे विसर्जन केले.तर सकाळपासूनच घरगुती गणेश भक्त बाप्पा मोरयाचा जयघोष करीत गणेश मूर्ती विसर्जनासाठी उजनी जलाशयाकडे घेऊन जाताना दिसत होते. यावर्षी विसर्जन मिरवणूक गुलालाचा वापर कमी प्रमाणात असल्याचे प्रकर्षाने दिसून आले.कोरोना संकटानंतर दोन वर्षांनी प्रथमच विना निर्बंध गणेशोत्सव साजरा करण्यात आला.
करमाळा प्रतिनिधी: अमरावती येथे सुरू असलेल्या ३४ व्या ज्युनियर राज्य फेंसिंग अजिंक्यपद स्पर्धा २०२६ मध्ये…
करमाळा प्रतिनिधी: गेल्या दोन-तीन वर्षांपासून शेतकरी वर्ग सातत्याने अस्मानी आणि सुलतानी संकटांचा सामना करत आहे.…
करमाळा प्रतिनिधी बैलपोळा हा केवळ बैलांच्या पूजनाचा सण नसून, कृषीसंस्कृती, पशुप्रेम, कृतज्ञता आणि भारतीय परंपरेतील…
* करमाळा प्रतिनिधी : श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त करमाळा येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या…
करमाळा प्रतिनिधी गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा, सामाजिक एकोपा आणि सांस्कृतिक परंपरेचा उत्सव म्हणून साजरा होत…
करमाळा प्रतिनिधी : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जन्माचे ७५० वे वर्ष राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरे…