करमाळा प्रतिनिधी सध्या महाराष्ट्र राज्यातील जळगाव, अहमदनगर,पुणे व धुळे या जिल्ह्यामध्ये पाळीव जनावरामध्ये लंपी या रोगाने थैमान घातले असुन त्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात पाळीव जनावरावर होत आहे.प्रामुख्याने अहमदनगर जिल्हा या रोगाचे प्रमुख अग्रबिंदु बनला आहे.नगर जिल्हा हा करमाळा तालुक्याच्या लगत असल्यामुळे त्याचा प्रादुर्भाव करमाळा तालुक्यात होण्याची चिन्ह आहेत. तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण आहे.त्यामुळे या रोगावरील लसीची उपलब्धता लवकरात लवकर प्रशासनाने करावी अशी मागणी करमाळा तालुका काँग्रेस आय पक्षाचे तालुकाध्यक्ष प्रतापराव जगताप यांनी केली आहे.
गत दोन वर्षापासुन कोरोना सारख्या महारोगाने शेतकरी राजाचे कंबरडे मोडलेले असताना आता पाळीव जनावरावर आलेले संकटामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे.आजच्या वाढत्या महागाईने पाळीव प्राण्यांना संभाळणे अतिशय अवघड झालेले असताना आणखी किती संकटाचा सामना शेतकऱ्यांनी करायचा याचा विचार प्रशासनाने करायला हवा असे शेवटी श्री जगताप यांनी सांगितले.
करमाळा प्रतिनिधी: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जेऊर येथे शिवजन्मोत्सव समितीची स्थापना उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात…
करमाळा प्रतिनिधी बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांना विधान परिषदेवर संधी द्यावी अशी मागणी आपण…
* करमाळा प्रतिनिधी डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे संस्थापक महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा.श्री. राजा माने…
करमाळा प्रतिनिधी विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड यांचे वडील, कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे…
करमाळा प्रतिनिधी: विद्या विकास मंडळचे अध्यक्ष तथा यशवंतराव चव्हाण महाविद्यालयांशी संबंधित नामदेवराव जगताप अध्यापक विद्यालयाचे…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील विद्या विकास मंडळ संचलित यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात महाराष्ट्र राज्य माध्यमिक व…