करमाळा प्रतिनिधी सध्या महाराष्ट्र राज्यातील जळगाव, अहमदनगर,पुणे व धुळे या जिल्ह्यामध्ये पाळीव जनावरामध्ये लंपी या रोगाने थैमान घातले असुन त्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात पाळीव जनावरावर होत आहे.प्रामुख्याने अहमदनगर जिल्हा या रोगाचे प्रमुख अग्रबिंदु बनला आहे.नगर जिल्हा हा करमाळा तालुक्याच्या लगत असल्यामुळे त्याचा प्रादुर्भाव करमाळा तालुक्यात होण्याची चिन्ह आहेत. तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण आहे.त्यामुळे या रोगावरील लसीची उपलब्धता लवकरात लवकर प्रशासनाने करावी अशी मागणी करमाळा तालुका काँग्रेस आय पक्षाचे तालुकाध्यक्ष प्रतापराव जगताप यांनी केली आहे.
गत दोन वर्षापासुन कोरोना सारख्या महारोगाने शेतकरी राजाचे कंबरडे मोडलेले असताना आता पाळीव जनावरावर आलेले संकटामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे.आजच्या वाढत्या महागाईने पाळीव प्राण्यांना संभाळणे अतिशय अवघड झालेले असताना आणखी किती संकटाचा सामना शेतकऱ्यांनी करायचा याचा विचार प्रशासनाने करायला हवा असे शेवटी श्री जगताप यांनी सांगितले.
करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…
जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…
* करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्हा कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक अकलूज…
करमाळा प्रतिनिधी सध्याच्या आधुनिक काळात पत्रकारिता क्षेत्रात मोठ्या संख्येने नवोदित आणि होतकरू तरुण वर्ग…
करमाळा : प्रतिनिधी करमाळा शहरासह तालुक्यातील नागरिकांसाठी आरोग्यसेवेच्या क्षेत्रात महत्त्वाची भर पडणार असून, जाधव-पाटील हॉस्पिटलमध्ये…
करमाळा: प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा वीजपुरवठा सातत्याने खंडित करणे आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज वीज…