मांगी प्रतिनिधी
राज्यात एकीकडे मुसळधार पाऊस असताना करमाळा तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी होते ,यामुळे तालुक्यातील बरेचसे लघु प्रकल्प कोरडे पडले होते ,पावसाचा जोर कमी असल्याने मागील दोन-तीन महिन्यापूर्वी अत्यल्प पाणीसाठा असणाऱ्या मांगी तलावात काल दिनांक 12 सप्टेंबर च्या रात्री नगर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणीसाठा वाढलेला आहे ,रात्रीच्या पावसामुळे चार ते पाच फुट एवढी पाणी पातळीत वाढ झालेली आहे, यामुळे मांगी तलाव लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांसह मांगी तलावाच्या खालील बारा गावच्या बोरगाव पाणीपुरवठा योजनेचा पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटलेला आहे, यामुळे लाभ क्षेत्रातील गावांमध्ये आनंदाचे वातावरण आहे ,अवघ्या रात्रीतून पाणी पातळीत प्रचंड वाढ झाल्यामुळे ,तलावातील शेती पंप काढण्यासाठी शेतकऱ्यांची मात्र तारांबळ उडाली, मांगी तलावातील पाण्याचा उपयोग नियोजनबद्ध करावा जेणेकरून उन्हाळ्यामध्ये तलावातील पाण्याची पातळी कमी होऊन पाणी टंचाईचा होणार नाही, त्याचप्रमाणे मांगी तलावावरती मोठ्या प्रमाणात वाढलेल्या काटेरी झुडपांची सफाई करण्यात यावी अशी मागणी मांगी येथील सामाजिक कार्यकर्ते प्रवीणकुमार अवचर यांनी पाटबंधारे विभागाकडे केलेले आहे,
करमाळा प्रतिनिधी: अखंड हिंदुस्तानचे दैवत म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त करमाळा शहरात…
करमाळा प्रतिनिधी: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जेऊर येथे शिवजन्मोत्सव समितीची स्थापना उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात…
करमाळा प्रतिनिधी बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांना विधान परिषदेवर संधी द्यावी अशी मागणी आपण…
* करमाळा प्रतिनिधी डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे संस्थापक महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा.श्री. राजा माने…
करमाळा प्रतिनिधी विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड यांचे वडील, कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे…
करमाळा प्रतिनिधी: विद्या विकास मंडळचे अध्यक्ष तथा यशवंतराव चव्हाण महाविद्यालयांशी संबंधित नामदेवराव जगताप अध्यापक विद्यालयाचे…