करमाळा प्रतिनिधी
प्रहार संघटनेच्या सोलापूर जिल्हा अध्यक्षा वंदना पंत यांनी प्रहारला सोडचिठठी देत शेतकरी नेते अतुल खूपसे पाटील यांच्या संघटन कौशल्य व चळवळीकडे आकर्षित होत शेकडो महिलांसह जनशक्ती संघटनेमध्ये प्रवेश केला असून यामुळे प्रहार संघटनेला खिंडार पडल्याचे बोलले जात आहे.
यावेळी पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख बाबाराजे कोळेकर, सोलापूर जिल्हाध्यक्ष नितीन जगताप, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अरुण भोसले, पंढरपूर तालुक्यातील युवक अध्यक्ष गणेश ढोबळे, महाराष्ट्र मार्गदर्शक बापुराव मोहिते, रवी गंभिरे, दादा पाटेकर, सुनील मुंडफणे, नागनाथ फरतडे, सुहास फरतडे, अक्षय महाडीक यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेतकरी, विद्यार्थी, ऊसतोड कामगार, ऊस वाहतूकदार, मत्स्यव्यवसायदार यांच्यासाठी अतुल खूपसे पाटील यांनी नेहमीच आक्रमक भूमिका घेत या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी शासन दरबारी अथवा कारखानदारांच्या दारात आंदोलन उभे केले आहे. न्याय मिळाल्याशिवाय कोणतीच तडजोड आज पर्यंत झालेले नाही. त्यामुळे जनशक्ती सारख्या आक्रमक संघटनेकडे आकर्षित होऊन आम्ही शेकडो महिलांनी जनशक्ती संघटनेमध्ये प्रवेश केला आहे. येणाऱ्या काळात अशाच पद्धतीने आक्रमक होऊन महिलांसाठी काम करून संघटना तळागाळात पोहोचविणार.
– वंदना पंत
करमाळा प्रतिनिधी: अखंड हिंदुस्तानचे दैवत म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त करमाळा शहरात…
करमाळा प्रतिनिधी: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जेऊर येथे शिवजन्मोत्सव समितीची स्थापना उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात…
करमाळा प्रतिनिधी बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांना विधान परिषदेवर संधी द्यावी अशी मागणी आपण…
* करमाळा प्रतिनिधी डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे संस्थापक महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा.श्री. राजा माने…
करमाळा प्रतिनिधी विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड यांचे वडील, कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे…
करमाळा प्रतिनिधी: विद्या विकास मंडळचे अध्यक्ष तथा यशवंतराव चव्हाण महाविद्यालयांशी संबंधित नामदेवराव जगताप अध्यापक विद्यालयाचे…