करमाळा प्रतिनिधी करमाळा दि.३/१०/२०२२ येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालया मध्ये महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून ‘ महात्मा गांधी आणि युवा पिढी’ या विषयावर ख्यातनाम विधीतज्ञ आणि संतसाहित्याचे अभ्यासक ॲड. डॉ. बाबूराव हिरडे यांच्या विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एल बी पाटील हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलींद फंड, सहसचिव विक्रम सूर्यवंशी,उपप्राचार्य डॉ अनिल साळुंखे, कॅप्टन प्रा संभाजी किर्दाक उपस्थित होते.. नवभारताच्या निर्मिती साठी म. गांधी यांच्या विचारांना पर्याय नसून त्यांच्या विचारांचे अनुकरण आजच्या युवा पिढीने करणे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन डॉ बाबूराव हिरडे यांनी केले. तसेच म. गांधी यांचे विचारच आज देशाला तारून नेवू शकतात असे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मिलींद फंड यांनी केले. अध्यक्षीय समारोपामध्ये प्राचार्य डॉ पाटील यांनी म. गांधी यांच्या अहिंसा, सत्य, अपरिग्रह आणि मौन यांमध्ये असलेल्या सामर्थ्याचे सोदाहरण स्पष्टीकरण केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा विष्णू शिंदे यांनी केले.
करमाळा / प्रतिनिधी करमाळा, येथील एकलव्य प्राथमिक आश्रमशाळेत निवासी विद्यार्थ्यांसाठी बंक बेडची व्यवस्था करण्यात आली…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात सुरू असलेल्या हनुमान चालीसा पठण उपक्रमाने सलग 151 आठवड्यांचा टप्पा यशस्वीरित्या…
आदरणीय प्रा. रामदास झोळ सरांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!काही माणसं आयुष्यात फक्त भेटत नाहीत… तर आयुष्य…
करमाळा (प्रतिनिधी) – ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शालेय प्रवेशासाठी आवश्यक असणाऱ्या शासकीय दाखल्यांसाठी होणारी गैरसोय…
करमाळा प्रतिनिधी. करमाळा विधानसभा मतदारसंघात सखोल मतदार पुनर्निरीक्षण (SIR) कार्यक्रम अंतर्गत मतदार यादी अचूक करण्यासाठी…
* करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील भागवत कथा ज्ञानयज्ञ समिती व संत गजानन महाराज मंदिर समिती…