करमाळा प्रतिंनिधी करमाळा तालुक्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक होण्याची शक्यता वाढली असून शेतकऱ्यांनी याला बळी न पडता सगळ्यांनी एकी दाखवण्याची गरज असुन या कंपन्यांचा शेतकऱ्यांना लुटण्याचा डाव हाणून पाडला पाहिजे असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक चिखलठाणचे सरपंच चंद्रकांत सरडे यांनी केले आहे.यावेळी बोलताना सरडे म्हणाले की, निर्यातक्षम केळीच्या दरात कसलीही घसरण झाली नाही. केळीसह खोडवा केळीच्या मागणीत मागील दोन दिवसात वाढ झाली आहे. निर्यातदार कंपन्या कडून २७ रुपये ते २८ रुपये दराने खरेदी चालू आहे. परंतु एजंट, व्यापारी यांच्या कडून जाणुनबुजून दर पाडण्याचा घाट घातला जात आहे.
बंदरात शिप नाही, शिप लागण्याची तारीख पुढे ढकलली आहे, शिप ऊपलब्ध नाही असे कारण दिले जात आहे. जर कमी दरात शेतकर्यांनी माल दिला तर ही कारणे न देता लगेच खरेदी केली जात आहे. त्यामुळे सर्व केळी उत्पादक शेतकऱ्यांनी एकीच बळ दाखवत व्यापाऱ्यांचा दर पाडण्याचा डाव हाणून पाडावा. सर्व शेतकर्यांनी कमी दरात मालाची विक्री करु नये असे आवाहन केले आहे.
येणाऱ्या काळात हाच दर पंधरा रुपयापर्यंत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे शेतकऱ्यांची अडचण पाहता या कंपन्या शेतकऱ्यांना लुटण्याचाच प्रयत्न करणार आहेत. यामुळे त्यांच्या भूलथापांना बळी न पडता शेतकऱ्यांनी एकी दाखवत यांचा डाव हाणून पाडला तरच शेतकऱ्यांना योग्य भाव मिळू शकतो. या सर्व प्रकरणात सरकारनेही लक्ष घालण्याची आवाहन यावेळी सरडे यांनी केले आहे.
करमाळा : प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराज तरुण मंडळ गणेशोत्सव २०२६ समितीच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड…
करमाळा प्रतिनिधी महाराष्ट्र इंग्लिश मीडियम ट्रस्टीज असोसिएशन एफच्या तालुकाध्यक्षपदी जयंत दळवी यांची नियुक्ती करण्यात आली…
करमाळा : प्रतिनिधी : कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे कर्तव्यनिष्ठ मुख्याध्यापक श्री. सुनील जनार्दन जाधव यांना…
करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवानिमित्त गजानन सोशल अँड स्पोर्ट्स क्लब, करमाळा यांच्या वतीने बुधवार, दि.…
करमाळा प्रतिनिधी : - शेतकऱ्याच्या जीवनात बैलाला केवळ शेतीकामातील पशुधन म्हणून नव्हे, तर कुटुंबातील…
करमाळा: प्रतिनिधी शेतकऱ्यांना रासायनिक खते पारदर्शक आणि सुलभ पद्धतीने उपलब्ध व्हावीत, तसेच खतांच्या विक्रीतील काळाबाजार,…