केतुर प्रतिनिधी
राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे यांना पश्चिम भागातील युवक नेते ॲड. अजित विघ्ने यांनी मेल केलेला असुन सरकार स्थापन होताच केलेल्या सर्व घोषणांची अंमलबजावणी करने बाबत विनंती केली आहे.. रेग्युलर शेतकरी कर्जदारांना सरसकट ५०,०००/- देण्याची घोषणा केलेली असुन १ सष्टें पासुन पैसे खातेवर जमा होतील असे सांगितले परंतु प्रत्यक्षात कोणत्याही शेतकर्याला अद्याप पैसे मिळालेले नाहीत तसेच संजय गांधी निराधार मधील लाभार्थ्यांना दिवाळीपूर्वी अनुदानाची रक्कम मिळावी अशीही मागणी केली आहे.. आणि मागिल सरकार च्या काळातील मंजुर योजनांना जी स्थगिती दिलेली आहे ती उठवावी व सर्वसामान्य जनतेची विकासकामे मार्गी लागावीत अशी अपेक्षा त्यांनी पत्रात व्यक्त केली आहे.. त्यांचेशी अधिक बोलताना त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री साहेबांना सण, समारंभ, आरत्या आणि मेळावे यातुन सध्या वेळ नाही, त्यातच शिवसेना कोणाची याचा वाद सतत चालु आहे, त्यामुळे यातुन वेळ काढुन जरा सर्वसामान्य जनतेची रखडलेली कामे तातडीने करावीत अशी अपेक्षा असुन.. तसे पत्र मेल द्वारे पाठविलेले असुन मुख्यमंत्री कार्यालयास ते पत्र मिळाले असल्याचा व याबाबत पुढील योग्य ती कार्यवाही करणार असलेचे देखिल कळविल्याचे सांगितले.
करमाळा, प्रतिनिधी : करमाळा येथील श्री संत नामदेव शिंपी समाजाच्या वतीने श्रीसंत नामदेव शिंपी महाराज…
करमाळा प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेसचे करमाळा तालुकाध्यक्ष तथा पंचायत समिती सदस्य भरत (भाऊ) आवताडे यांच्या…
* करमाळा, प्रतिनिधी : करमाळा शहरातील शाहूनगर परिसरातील नागरिकांच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या पाणीप्रश्नाच्या निराकरणाच्या दिशेने…
करमाळा (प्रतिनिधी) – करमाळा येथील ग्रामदैवत श्रीजगदंबा कमलादेवी मंदिराच्या जतन व संवर्धनाच्या कामाला भाविकांचा उत्स्फूर्त…
करमाळा प्रतिनिधी : संजय गांधी निराधार योजनेची प्रकरणे मार्च महिन्यामध्ये मंजूर झाली होती त्यानंतर चार…
करमाळा प्रतिनिधी भाषा ही केवळ परीक्षेतील गुणांची बाब नसून विद्यार्थ्यांच्या विचारांना आकार देणारे आणि जगाशी…