करमाळा प्रतिनिधी.
सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यामध्ये खरीप हंगामात सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस पडल्यामुळे व परतीच्या पावसाने हाहाकार केल्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतीचे व पिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे. त्यामुळे शासनाने तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट मदत जाहीर करावी असे निवेदन आ. संजयमामा शिंदे यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे साहेब यांना दिले आहे. या निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर साहेब यांनाही माहितीसाठी दिली आहे.
सदर निवेदनामध्ये त्यांनी म्हटले आहे की, करमाळा माढा विधानसभा मतदारसंघांमध्ये दिनांक 6 ऑक्टोबर पासून ते 12 ऑक्टोबर पर्यंत सालसे, केम, अर्जुननगर, जेऊर, कोर्टी, केतुर, उमरड या महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झाली असून सदर गावामध्ये पंचनामे सुरू आहेत. सदर मंडळामध्ये सरासरीच्या पाचपट अधिक पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कांदा, उडीद, तूर, मका, सूर्यफूल, केळी, भाजीपाला इत्यादी पिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालेले आहे.
करमाळा तालुक्यामध्ये जून ते 12 ऑक्टोबर 2022 अखेर सरासरीच्या तुलनेने 170 टक्के पाऊस झाला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने रब्बी हंगाम लांबणीवर पडणार असून ज्वारी ,हरभरा, कांदा या पिकांच्या लागवडी कमी होण्याची शक्यता आहे.
तरी करमाळा तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट तात्काळ मदत देण्यात यावी असे पत्र आमदार शिंदे यांनी दिले आहे.निवेदनाच्या
प्रती ना. देवेंद्रजी फडणवीस साहेब, विरोधी पक्ष नेते अजित दादा पवार साहेब यांनाही दिलेल्या आहेत.
करमाळा प्रतिनिधी: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जेऊर येथे शिवजन्मोत्सव समितीची स्थापना उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात…
करमाळा प्रतिनिधी बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांना विधान परिषदेवर संधी द्यावी अशी मागणी आपण…
* करमाळा प्रतिनिधी डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे संस्थापक महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा.श्री. राजा माने…
करमाळा प्रतिनिधी विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड यांचे वडील, कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे…
करमाळा प्रतिनिधी: विद्या विकास मंडळचे अध्यक्ष तथा यशवंतराव चव्हाण महाविद्यालयांशी संबंधित नामदेवराव जगताप अध्यापक विद्यालयाचे…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील विद्या विकास मंडळ संचलित यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात महाराष्ट्र राज्य माध्यमिक व…