करमाळा प्रतिनिधी
तालुक्यातील सर्व केळी बागांना पाणी लागल्यामुळे सर्रास केळी पिकांची मुळकुज झालेली आहे .त्यामुळे बागेमध्ये करपा, शिगा टोका, तांबोरा, गडावरील पिटिंग रोग व बुरशीजन्य रोग इत्यादींचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव वाढलेला आहे. अति पावसामुळे तालुक्यातील निर्यातक्षम केळी आत्ता कवडीमोल दराने द्यावी लागणार आहे .प्रत्यक्षात पावसामुळे केळी पिकाचे 50 ते 90 टक्के पर्यंत नुकसान झालेले आहे.
तरी तालुक्यातील सर्व केळी बागांचे पंचनामे सरसकट करून केळी उत्पादक शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने न्याय द्यावा व संबंधितांना योग्य ते आदेश द्यावे असे निवेदन जिल्हाधिकारी यांना दिलेले आहे. या निवेदनाच्या प्रती प्रांत आधिकारी यांचेसह तहसीलदार करमाळा व तालुका कृषी अधिकारी करमाळा यांना दिलेल्या आहेत.
केळी हे खूप खर्चिक व संवेदनशील पीक आहे. या पिकाला सर्व गोष्टी प्रमाणातच लागतात. आज करमाळा तालुक्यातील केळी ही जागतिक बाजारपेठेमध्ये आपला वेगळेपणाचा ठसा टिकवून आहे. परंतु निर्यातक्षम दर्जाची केळी आणण्यासाठी तालुक्यातील शेतकरी एकरी 70 हजार ते 1 लाख रुपये पर्यंत खर्च करत असतो .यावर्षी अतिवृष्टीमुळे फवारणीचा खर्च अधिक वाढणार आहे त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे.केळी उत्पादक शेतकऱ्यांना याचा फटका बसणार आहे .शासनाने केळी पिकांसह सर्व पिकांचे पंचनामे सरसकट केले पाहिजे अशी आमची आग्रही मागणी आहे.
डॉ. विकास वीर
अध्यक्ष, राजे रावरंभा शेतकरी प्रोडूसर कंपनी लि. करमाळा.
करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…
करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…
करमाळा प्रतिनिधी — गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव म्हणून साजरा न करता त्याला सामाजिक बांधिलकीची…
करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…
* करमाळा प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…
करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…