करमाळा प्रतिनिधी
तालुक्यातील सर्व केळी बागांना पाणी लागल्यामुळे सर्रास केळी पिकांची मुळकुज झालेली आहे .त्यामुळे बागेमध्ये करपा, शिगा टोका, तांबोरा, गडावरील पिटिंग रोग व बुरशीजन्य रोग इत्यादींचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव वाढलेला आहे. अति पावसामुळे तालुक्यातील निर्यातक्षम केळी आत्ता कवडीमोल दराने द्यावी लागणार आहे .प्रत्यक्षात पावसामुळे केळी पिकाचे 50 ते 90 टक्के पर्यंत नुकसान झालेले आहे.
तरी तालुक्यातील सर्व केळी बागांचे पंचनामे सरसकट करून केळी उत्पादक शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने न्याय द्यावा व संबंधितांना योग्य ते आदेश द्यावे असे निवेदन जिल्हाधिकारी यांना दिलेले आहे. या निवेदनाच्या प्रती प्रांत आधिकारी यांचेसह तहसीलदार करमाळा व तालुका कृषी अधिकारी करमाळा यांना दिलेल्या आहेत.
केळी हे खूप खर्चिक व संवेदनशील पीक आहे. या पिकाला सर्व गोष्टी प्रमाणातच लागतात. आज करमाळा तालुक्यातील केळी ही जागतिक बाजारपेठेमध्ये आपला वेगळेपणाचा ठसा टिकवून आहे. परंतु निर्यातक्षम दर्जाची केळी आणण्यासाठी तालुक्यातील शेतकरी एकरी 70 हजार ते 1 लाख रुपये पर्यंत खर्च करत असतो .यावर्षी अतिवृष्टीमुळे फवारणीचा खर्च अधिक वाढणार आहे त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे.केळी उत्पादक शेतकऱ्यांना याचा फटका बसणार आहे .शासनाने केळी पिकांसह सर्व पिकांचे पंचनामे सरसकट केले पाहिजे अशी आमची आग्रही मागणी आहे.
डॉ. विकास वीर
अध्यक्ष, राजे रावरंभा शेतकरी प्रोडूसर कंपनी लि. करमाळा.
करमाळा प्रतिनिधी: अखंड हिंदुस्तानचे दैवत म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त करमाळा शहरात…
करमाळा प्रतिनिधी: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जेऊर येथे शिवजन्मोत्सव समितीची स्थापना उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात…
करमाळा प्रतिनिधी बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांना विधान परिषदेवर संधी द्यावी अशी मागणी आपण…
* करमाळा प्रतिनिधी डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे संस्थापक महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा.श्री. राजा माने…
करमाळा प्रतिनिधी विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड यांचे वडील, कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे…
करमाळा प्रतिनिधी: विद्या विकास मंडळचे अध्यक्ष तथा यशवंतराव चव्हाण महाविद्यालयांशी संबंधित नामदेवराव जगताप अध्यापक विद्यालयाचे…