केत्तूर (अभय माने ) : यंदा शंभर टक्के ऊस गाळपाचे आमचे उदिष्ट आहे. शेतकऱ्यांनी साथ दिल्यास संपूर्ण ऊस गाळपाची जबाबदारी आमची राहील असे प्रतिपादन अंबालिका शुगरचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश तावरे यांनी शुक्रवारी केले. ते 12 व्या गळीत हंगामाच्या प्रारंभ करताना बोलत होते.
कर्जत तालुक्याची कामधेनू असलेल्या अंबालिका शुगरच्या गळीत हंगामाचा प्रारंभ शुक्रवारी (ता. 14) संचालक विश्वजित भोसले, मुख्य संचालन अधिकारी जंगल वाघ, मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश तावरे, जनरल मॅनेजर सुरेश शिंदे, मुख्य शेतकी अधिकारी विठ्ठल भोसले, श्याम कानगुडे, माधुरी पाटील, अण्णासाहेब मोरे, नवनाथ झोळ, संजय सुद्रिक, विजय मोढळे, अच्युतराव लोंढे, अॅड. बाळासाहेब शिंदे, नितीन धांडे, संजय तोरडमल, सुहास गलांडे, सागर लोंढे यांच्यासह कर्जत, करमाळा, श्रीगोंदा, इंदापूर, शिरूर या तालुक्यातील ऊस उत्पादक, कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत दिमाखदार सोहळ्यात संपन्न झाला.
तावरे म्हणाले, अंबालिकाने सर्व भागातील ऊस आणण्याचे विभागवार नियोजन केले आहे. त्यात प्राधान्याने कर्जतचा ऊस आणला जाईल. मागील गळीत हंगामात 19लाख 51 हजार मे. टन ऊसाचे गळीत करून एफआरपीची संपूर्ण रक्कम कारखान्याने प्रति मे.टन रू.2801 प्रमाणे ऊस उत्पादकांच्या खात्यावर वर्ग केली आहे. शेतकऱ्यांनी उसाची लागण केल्याबरोबर नोंद करावी, यंदा उसाचा दर शेतकऱ्यांच्या हातात आहे. जितका ऊस दर्जेदार द्याल त्याच्या रिकव्हरीनुसार दर मिळेल. अंबालिकाच्या कामगारांना वेतन मंडळ लागू करतोय. तसेच इथेनॉल व वीजनिर्मिती वाढवतोय.
जनरल मॅनेजर सुरेश शिंदे म्हणाले, उसाची नोंद करणे गाळपासाठी महत्वाचे आहे. कोणाचाही ऊस शिल्लक ठेवणार नाही. शेतकऱ्यांनी बेणं चांगले वापरावे.
पंचायत समितीचे माजी सदस्य अण्णासाहेब मोरे यांनी यंदा तीन हजारांचा दर जाहीर करावा अशी मागणी करीत कामगारांना वेतनवाढ दिल्याबद्दल अंबालिकाचे अभिनंदन करून, नगर जिल्ह्यात उत्कृष्ट दर देणार कारखाना म्हणून कौतुक केले. यावेळी नवनाथ झोळ,विजय मोढळे, संजय सुद्रिक, सागर लोंढे,संजय तोरडमल यांची भाषणे झाली. तानाजी झोळ, नागेश लकडे धुळाभाऊ कोकरे,ऊस उत्पादक शेतकरी, तोडणी वाहतुक कंत्राटदार उपस्थित होते.सूत्रसंचालन प्रदीप जांभळे यांनी केले. आभार सुरेश शिंदे यांनी मानले.
करमाळा (प्रतिनिधी) – करमाळा येथील ग्रामदैवत श्रीजगदंबा कमलादेवी मंदिराच्या जतन व संवर्धनाच्या कामाला भाविकांचा उत्स्फूर्त…
करमाळा प्रतिनिधी : संजय गांधी निराधार योजनेची प्रकरणे मार्च महिन्यामध्ये मंजूर झाली होती त्यानंतर चार…
करमाळा प्रतिनिधी भाषा ही केवळ परीक्षेतील गुणांची बाब नसून विद्यार्थ्यांच्या विचारांना आकार देणारे आणि जगाशी…
करमाळा प्रतिनिधी - मानव एकता दिनानिमित्त संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन दिल्ली शाखा करमाळा यांचे वतीने…
करमाळा प्रतिनिधी :- महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा.…
करमाळा प्रतिनिधी दिग्वीजय बागल यांची ' मूख्यमंत्री बळीराजा पाणंद/ शेत रस्ता समिती च्या करमाळा विधानसभा…