करमाळा प्रतिनिधी..
दोन वर्ष कोरोनाच्या काळामध्ये कोविड सेंटरवर करोडोंच्या पटीने सेंटरला खर्च केला होता त्याच पद्धतीने शेतकऱ्यांच्या खात्यात सरसकट पन्नास हजार जमा करावेत अशी मागणी भिमदल संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनिल भोसले यांनी केली आहे, सध्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे व सर्वसामान्यांचे मोठे नुकसान झाले आहे, त्यासाठी महाराष्ट्र शासनाने ज्या पद्धतीने कोरोनावर प्रत्येक जिल्हा, तालुका वाईज खर्च केला होता त्याच पद्धतीने प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यात एकरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी, सदरची उदभवलेली परिस्थिती बिकट आहे, त्यामुळे
ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट एकरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी,
महाराष्ट्र राज्यामध्ये जून महिन्यापासून अनेक जिल्ह्यांमध्ये ठिकाणी अतिदृष्टी पाऊस झाला या पावसामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये तालुक्यामध्ये भयंकर स्वरूपाचे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले त्यामुळे दिवाळी सण साजरी होणार नाही, त्यांची संपूर्ण पिके पाण्यामध्ये गेल्यामुळे खर्चाचा मोठा डोंगर डोक्यावर उभा राहिल्याने महाराष्ट्र शासनाने ज्या पद्धतीने कोरोनाच्या काळामध्ये दोन वर्ष कोविड सेंटरवर लाखोच्या पटीने खर्च केला होता त्याच पटीने आता शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचा खर्च करावा, अशी मागणी भिमदल संघटनेने प्रसिद्ध पत्रकाद्वारे केली आहे..
करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…
जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…
* करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्हा कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक अकलूज…
करमाळा प्रतिनिधी सध्याच्या आधुनिक काळात पत्रकारिता क्षेत्रात मोठ्या संख्येने नवोदित आणि होतकरू तरुण वर्ग…
करमाळा : प्रतिनिधी करमाळा शहरासह तालुक्यातील नागरिकांसाठी आरोग्यसेवेच्या क्षेत्रात महत्त्वाची भर पडणार असून, जाधव-पाटील हॉस्पिटलमध्ये…
करमाळा: प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा वीजपुरवठा सातत्याने खंडित करणे आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज वीज…