करमाळा प्रतिनिधी..
दोन वर्ष कोरोनाच्या काळामध्ये कोविड सेंटरवर करोडोंच्या पटीने सेंटरला खर्च केला होता त्याच पद्धतीने शेतकऱ्यांच्या खात्यात सरसकट पन्नास हजार जमा करावेत अशी मागणी भिमदल संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनिल भोसले यांनी केली आहे, सध्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे व सर्वसामान्यांचे मोठे नुकसान झाले आहे, त्यासाठी महाराष्ट्र शासनाने ज्या पद्धतीने कोरोनावर प्रत्येक जिल्हा, तालुका वाईज खर्च केला होता त्याच पद्धतीने प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यात एकरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी, सदरची उदभवलेली परिस्थिती बिकट आहे, त्यामुळे
ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट एकरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी,
महाराष्ट्र राज्यामध्ये जून महिन्यापासून अनेक जिल्ह्यांमध्ये ठिकाणी अतिदृष्टी पाऊस झाला या पावसामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये तालुक्यामध्ये भयंकर स्वरूपाचे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले त्यामुळे दिवाळी सण साजरी होणार नाही, त्यांची संपूर्ण पिके पाण्यामध्ये गेल्यामुळे खर्चाचा मोठा डोंगर डोक्यावर उभा राहिल्याने महाराष्ट्र शासनाने ज्या पद्धतीने कोरोनाच्या काळामध्ये दोन वर्ष कोविड सेंटरवर लाखोच्या पटीने खर्च केला होता त्याच पटीने आता शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचा खर्च करावा, अशी मागणी भिमदल संघटनेने प्रसिद्ध पत्रकाद्वारे केली आहे..
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात सुरू असलेल्या हनुमान चालीसा पठण उपक्रमाने सलग 151 आठवड्यांचा टप्पा यशस्वीरित्या…
आदरणीय प्रा. रामदास झोळ सरांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!काही माणसं आयुष्यात फक्त भेटत नाहीत… तर आयुष्य…
करमाळा (प्रतिनिधी) – ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शालेय प्रवेशासाठी आवश्यक असणाऱ्या शासकीय दाखल्यांसाठी होणारी गैरसोय…
करमाळा प्रतिनिधी. करमाळा विधानसभा मतदारसंघात सखोल मतदार पुनर्निरीक्षण (SIR) कार्यक्रम अंतर्गत मतदार यादी अचूक करण्यासाठी…
* करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील भागवत कथा ज्ञानयज्ञ समिती व संत गजानन महाराज मंदिर समिती…
सोलापूर प्रतिनिधी शासनाच्या पगारी घेणाऱ्या सर्व शिक्षकांनी नेमणुकीच्या ठिकाणी राहणे अपेक्षित आहे असे होत नाही…