केत्तुर प्रतिनिधी
माढ्याचे भाजपाचे खासदार श्री. रणजित नाईक निंबाळकर यांनी रेल्वे बोर्डाचे सदस्यत्वाचा राजीनामा दिलेची बातमी पाहिली.. आम्हीही गेली अनेक वर्षापासुन रेल्वे विभागाकडे आमचे पारेवाडी रेल्वे स्थानकावर एक्सप्रेस गाडयांना थांबा मिळणेबाबत प्रयत्नशिल असुन, सन-१९९६ साली रेल्वे रोको आंदोलन केले होते.. सध्याही मध्य रेल्वेचे दुहेरीकरणाचे काम प्रगतीपथावर असून रेल्वे गेट बंद करून त्या ठिकाणी बोगद्याची कामे चालु आहेत, ही कामे अतिशय निकृष्ट दर्जाची होत असुन, बोगद्यामधे प्रचंड पाणी साठत आहे, ड्रेनेज व्यवस्था नाही, निकृष्ट दर्जाचे सिमेंट कॉंक्रीटीकरण होत असुन, जिथे फ्लाय ओव्हर ब्रीज ची आवश्यकता आहे तिथे रेल्वेने नाहक बोगदयाला पसंती दिली आहे.. बोगदयाच्या दोन्ही बाजुकडील भिंतीना सिमेंट वॉल केलेले नाहीत… स्टेशनवरून नागरिकांना जाण्यायेण्या साठी स्वतंत्र पादचारी मार्ग दिलेला नाही.. स्टेशन आणि ऑफीसर्स कॉर्टस ची झालेली कामे देखिल निकृष्ठ दर्जाची झाली आहेत… विद्यमान खासदार साहेबांना आम्ही याबाबत बऱ्याचदा भेटलो परंतु त्यांचेकडुन आम्हाला प्रतिसाद मिळाला नाही, परंतु आज त्यांनीच रेल्वे बोर्ड सदस्याचा राजीनामा दिला यावरून सर्व सामान्यांना तर कधी न्याय मिळायचा अशी वस्तुस्थिती आहे..
करमाळा, प्रतिनिधी : करमाळा येथील श्री संत नामदेव शिंपी समाजाच्या वतीने श्रीसंत नामदेव शिंपी महाराज…
करमाळा प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेसचे करमाळा तालुकाध्यक्ष तथा पंचायत समिती सदस्य भरत (भाऊ) आवताडे यांच्या…
* करमाळा, प्रतिनिधी : करमाळा शहरातील शाहूनगर परिसरातील नागरिकांच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या पाणीप्रश्नाच्या निराकरणाच्या दिशेने…
करमाळा (प्रतिनिधी) – करमाळा येथील ग्रामदैवत श्रीजगदंबा कमलादेवी मंदिराच्या जतन व संवर्धनाच्या कामाला भाविकांचा उत्स्फूर्त…
करमाळा प्रतिनिधी : संजय गांधी निराधार योजनेची प्रकरणे मार्च महिन्यामध्ये मंजूर झाली होती त्यानंतर चार…
करमाळा प्रतिनिधी भाषा ही केवळ परीक्षेतील गुणांची बाब नसून विद्यार्थ्यांच्या विचारांना आकार देणारे आणि जगाशी…