रेल्वे भुयारी मार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे‌ झाल्यामुळे ऊसाच्या ट्रॅक्टरला अपघात सुदैवाने जीवीत हानी नाही रेल्वे प्रशासन कधी जागे होणार

राजाराम माने केत्तूर प्रतिनिधी पारेवाडीहून बारामती ॲग्रो कारखान्याकडे निघालेला उसाने भरलेला ट्रॅक्टर भगतवाडी (ता.करमाळा) गेटजवळ आज सायंकाळी चारच्या दरम्यान कोसळला. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी शेतकऱ्यांचे मात्र नुकसान झाले आहे.ट्रॅक्टर पडला त्या ठिकाणी ऊसतोड कामगारांच्या झोपड्या होत्या परंतु ट्रॅक्टर डाव्या बाजूला पडला आणि झोपड्या उजव्या बाजूला होत्या. ट्रॅक्टर उजव्या बाजूला पडला असता तर जीवितहानी झाली असती.रेल्वे प्रशासनाने या भुयारी मार्गाला जोडणारे रस्ते पक्के करावेत अशी मागणी ऊस वाहतूक दाराकडून होत आहे. सोलापूर पुणे रेल्वे महामार्ग ग्रामीण भागातून जात असून पूर्वी रेल्वे गेट असताना रेल्वेच्या दुहेरीकरण व विद्युतीकरण कामानंतर ठिकाणावरील रेल्वेगेट बंद करण्यात आली परंतु पर्यायी मार्ग उपलब्ध झाल्याशिवाय रेल्वे प्रशासनाला रेल्वे गेट बंद करता येत नाही असे असताना पारेवाडी, रामवाडी, भगतवाडी येथील रेल्वेगेट बंद करून भुयारी मार्ग चालू करण्यात आला परंतु या भुयारी मार्गाचे काम निकृष्ट दर्जाची झाले आहे पण प्रत्येक ठिकाणी थोडा पाऊस झाला तरी या भुयारी मार्गात पाणी साचत आहे.तसेच भुयारी मार्गाला जोडणारी रस्ते कच्ची असल्याने या मार्गावर घसरण होत आहे.शेतकऱ्यांना मालवाहतूक करताना जणू काही मरणाच्या दाढीतून जावे लागत आहे.ऊस गाळप हंगाम सुरू झाल्याने उसाचे ट्रॅक्टर ट्रक तसेच केळीचे कंटेनर रेल्वे गेट चालू होती त्यावेळेस सहजासहजी रस्त्यावरून रेल्वे ट्रॅक ओलांडून जात होते परंतु रेल्वेने उड्डाण पूल न करता पैसे वाचविण्यासाठी रेल्वे भुयारी मार्गाची कामे केली परंतु ही कामे कंत्राटदाराने अपुरी ठेवून शेतकऱ्यांची मालवाहतुकीसाठी अडचण करून ठेवली आहे या रस्त्याचे काम अगदी निकृष्ट दर्जाचे केले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना ऊसाची जड वाहतूक करताना व केळीची जड वाहतूक करताना वाहने त्या रस्त्यावर फसत असून व्यक्तींच्या जीवितास व वाहनास तसेच शेतीमालास धोका होत असून रेल्वे प्रशासन नक्की कधी जागे होणार आणि होणाऱ्या जीवित व आर्थिक नुकसान भरपाईस रेल्वे व संबंधित अधिकाऱ्यांस का जबाबदार धरले जाऊ नये ? असा सवाल शेतकऱ्यातून विचारला जात आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

शासकीय दाखले देण्यासाठी प्रत्येक विद्यालयात कॅम्प घ्या – गणेश चिवटे यांची मागणी

  करमाळा (प्रतिनिधी) – ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शालेय प्रवेशासाठी आवश्यक असणाऱ्या शासकीय दाखल्यांसाठी होणारी गैरसोय…

9 hours ago

करमाळा तालुक्यात मतदार यादी अचूक करण्यासाठी SIR मॅपिंग मोहिमेला वेग; तहसीलदार शिल्पाताई ठोकडे यांचे नागरिकांना सक्रिय सहभागासाठी आवाहन

करमाळा प्रतिनिधी. करमाळा विधानसभा मतदारसंघात सखोल मतदार पुनर्निरीक्षण (SIR) कार्यक्रम अंतर्गत मतदार यादी अचूक करण्यासाठी…

18 hours ago

करमाळ्यात 15 ते 21 मे दरम्यान स्नेहगंगामाई आळंदीकर यांच्या शिव महापुराण कथेचे भव्य आयोजन – श्रेणिकशेठ खाटेर*

* करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील भागवत कथा ज्ञानयज्ञ समिती व संत गजानन महाराज मंदिर समिती…

2 days ago

खासगी शाळेच्या संदर्भात चुकीची अफवा पसरवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार – जिल्हा अध्यक्ष संभाजी घाडगे

सोलापूर प्रतिनिधी शासनाच्या पगारी घेणाऱ्या सर्व शिक्षकांनी नेमणुकीच्या ठिकाणी राहणे अपेक्षित आहे असे होत नाही…

2 days ago

नामसाधना मॉडर्न स्कूलमध्ये ‘हॉर्स रायडिंग’चा दिमाखात शुभारंभ; जागतिक दर्जाच्या क्रीडा सुविधांसह प्रवेश प्रक्रिया सुरू!

​ ​करमाळा प्रतिनिधी  शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील नामांकित 'नामसाधना मॉडर्न स्कूल'…

2 days ago

डिजिटल मीडियाच्या ४ मे रोजी पणजी गोवा येथे होणाऱ्या महा अधिवेशनाच्या तयारीची राजा माने यांनी केली पाहणी

  पणजी /प्रतिनिधी डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या तिसऱ्या पणजी गोवा येथे ४ मे २०२६…

4 days ago