रेल्वे भुयारी मार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे‌ झाल्यामुळे ऊसाच्या ट्रॅक्टरला अपघात सुदैवाने जीवीत हानी नाही रेल्वे प्रशासन कधी जागे होणार

राजाराम माने केत्तूर प्रतिनिधी पारेवाडीहून बारामती ॲग्रो कारखान्याकडे निघालेला उसाने भरलेला ट्रॅक्टर भगतवाडी (ता.करमाळा) गेटजवळ आज सायंकाळी चारच्या दरम्यान कोसळला. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी शेतकऱ्यांचे मात्र नुकसान झाले आहे.ट्रॅक्टर पडला त्या ठिकाणी ऊसतोड कामगारांच्या झोपड्या होत्या परंतु ट्रॅक्टर डाव्या बाजूला पडला आणि झोपड्या उजव्या बाजूला होत्या. ट्रॅक्टर उजव्या बाजूला पडला असता तर जीवितहानी झाली असती.रेल्वे प्रशासनाने या भुयारी मार्गाला जोडणारे रस्ते पक्के करावेत अशी मागणी ऊस वाहतूक दाराकडून होत आहे. सोलापूर पुणे रेल्वे महामार्ग ग्रामीण भागातून जात असून पूर्वी रेल्वे गेट असताना रेल्वेच्या दुहेरीकरण व विद्युतीकरण कामानंतर ठिकाणावरील रेल्वेगेट बंद करण्यात आली परंतु पर्यायी मार्ग उपलब्ध झाल्याशिवाय रेल्वे प्रशासनाला रेल्वे गेट बंद करता येत नाही असे असताना पारेवाडी, रामवाडी, भगतवाडी येथील रेल्वेगेट बंद करून भुयारी मार्ग चालू करण्यात आला परंतु या भुयारी मार्गाचे काम निकृष्ट दर्जाची झाले आहे पण प्रत्येक ठिकाणी थोडा पाऊस झाला तरी या भुयारी मार्गात पाणी साचत आहे.तसेच भुयारी मार्गाला जोडणारी रस्ते कच्ची असल्याने या मार्गावर घसरण होत आहे.शेतकऱ्यांना मालवाहतूक करताना जणू काही मरणाच्या दाढीतून जावे लागत आहे.ऊस गाळप हंगाम सुरू झाल्याने उसाचे ट्रॅक्टर ट्रक तसेच केळीचे कंटेनर रेल्वे गेट चालू होती त्यावेळेस सहजासहजी रस्त्यावरून रेल्वे ट्रॅक ओलांडून जात होते परंतु रेल्वेने उड्डाण पूल न करता पैसे वाचविण्यासाठी रेल्वे भुयारी मार्गाची कामे केली परंतु ही कामे कंत्राटदाराने अपुरी ठेवून शेतकऱ्यांची मालवाहतुकीसाठी अडचण करून ठेवली आहे या रस्त्याचे काम अगदी निकृष्ट दर्जाचे केले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना ऊसाची जड वाहतूक करताना व केळीची जड वाहतूक करताना वाहने त्या रस्त्यावर फसत असून व्यक्तींच्या जीवितास व वाहनास तसेच शेतीमालास धोका होत असून रेल्वे प्रशासन नक्की कधी जागे होणार आणि होणाऱ्या जीवित व आर्थिक नुकसान भरपाईस रेल्वे व संबंधित अधिकाऱ्यांस का जबाबदार धरले जाऊ नये ? असा सवाल शेतकऱ्यातून विचारला जात आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

अखंड हिंदुस्तानचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त १९ फेब्रुवारीला करमाळ्यात भव्य रक्तदान शिबीर

करमाळा प्रतिनिधी: अखंड हिंदुस्तानचे दैवत म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त करमाळा शहरात…

10 hours ago

जेऊर येथे शिवजन्मोत्सव समितीची स्थापना; १ मार्च रोजी पारंपरिक पद्धतीने शिवजयंती साजरी होणार-पृथ्वीराज पाटील

करमाळा प्रतिनिधी: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जेऊर येथे शिवजन्मोत्सव समितीची स्थापना उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात…

14 hours ago

बार्शीचे मा.आमदार राजाभाऊ राऊत यांना विधानपरिषदेवर संधी द्यावी – माजी आमदार जयवंतराव जगताप

करमाळा प्रतिनिधी बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांना विधान परिषदेवर संधी द्यावी अशी मागणी आपण…

19 hours ago

डिजिटल मिडिया पत्रकार संपादक संघटनेचे अध्यक्ष राजा माने यांना दुबईत “पत्रकाररत्न” आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मान

* करमाळा प्रतिनिधी डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे संस्थापक महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा.श्री. राजा माने…

1 day ago

यशवंत परिवाराच्या वतीने स्व. अर्जुन तात्या फंड सर यांना भावपूर्ण श्रद्धांजली

करमाळा प्रतिनिधी विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड यांचे वडील, कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे…

1 day ago

विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड यांना पितृशोक; अर्जुन तात्या फंड सर यांचे दुःखद निधन

करमाळा प्रतिनिधी: विद्या विकास मंडळचे अध्यक्ष तथा यशवंतराव चव्हाण महाविद्यालयांशी संबंधित नामदेवराव जगताप अध्यापक विद्यालयाचे…

2 days ago