रेल्वे भुयारी मार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे‌ झाल्यामुळे ऊसाच्या ट्रॅक्टरला अपघात सुदैवाने जीवीत हानी नाही रेल्वे प्रशासन कधी जागे होणार

राजाराम माने केत्तूर प्रतिनिधी पारेवाडीहून बारामती ॲग्रो कारखान्याकडे निघालेला उसाने भरलेला ट्रॅक्टर भगतवाडी (ता.करमाळा) गेटजवळ आज सायंकाळी चारच्या दरम्यान कोसळला. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी शेतकऱ्यांचे मात्र नुकसान झाले आहे.ट्रॅक्टर पडला त्या ठिकाणी ऊसतोड कामगारांच्या झोपड्या होत्या परंतु ट्रॅक्टर डाव्या बाजूला पडला आणि झोपड्या उजव्या बाजूला होत्या. ट्रॅक्टर उजव्या बाजूला पडला असता तर जीवितहानी झाली असती.रेल्वे प्रशासनाने या भुयारी मार्गाला जोडणारे रस्ते पक्के करावेत अशी मागणी ऊस वाहतूक दाराकडून होत आहे. सोलापूर पुणे रेल्वे महामार्ग ग्रामीण भागातून जात असून पूर्वी रेल्वे गेट असताना रेल्वेच्या दुहेरीकरण व विद्युतीकरण कामानंतर ठिकाणावरील रेल्वेगेट बंद करण्यात आली परंतु पर्यायी मार्ग उपलब्ध झाल्याशिवाय रेल्वे प्रशासनाला रेल्वे गेट बंद करता येत नाही असे असताना पारेवाडी, रामवाडी, भगतवाडी येथील रेल्वेगेट बंद करून भुयारी मार्ग चालू करण्यात आला परंतु या भुयारी मार्गाचे काम निकृष्ट दर्जाची झाले आहे पण प्रत्येक ठिकाणी थोडा पाऊस झाला तरी या भुयारी मार्गात पाणी साचत आहे.तसेच भुयारी मार्गाला जोडणारी रस्ते कच्ची असल्याने या मार्गावर घसरण होत आहे.शेतकऱ्यांना मालवाहतूक करताना जणू काही मरणाच्या दाढीतून जावे लागत आहे.ऊस गाळप हंगाम सुरू झाल्याने उसाचे ट्रॅक्टर ट्रक तसेच केळीचे कंटेनर रेल्वे गेट चालू होती त्यावेळेस सहजासहजी रस्त्यावरून रेल्वे ट्रॅक ओलांडून जात होते परंतु रेल्वेने उड्डाण पूल न करता पैसे वाचविण्यासाठी रेल्वे भुयारी मार्गाची कामे केली परंतु ही कामे कंत्राटदाराने अपुरी ठेवून शेतकऱ्यांची मालवाहतुकीसाठी अडचण करून ठेवली आहे या रस्त्याचे काम अगदी निकृष्ट दर्जाचे केले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना ऊसाची जड वाहतूक करताना व केळीची जड वाहतूक करताना वाहने त्या रस्त्यावर फसत असून व्यक्तींच्या जीवितास व वाहनास तसेच शेतीमालास धोका होत असून रेल्वे प्रशासन नक्की कधी जागे होणार आणि होणाऱ्या जीवित व आर्थिक नुकसान भरपाईस रेल्वे व संबंधित अधिकाऱ्यांस का जबाबदार धरले जाऊ नये ? असा सवाल शेतकऱ्यातून विचारला जात आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळ्यात श्री संत नामदेव शिंपी महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहास भक्तिमय प्रारंभ११ ऑगस्ट रोजी संजीवन समाधी सोहळा महाप्रसाद,

करमाळा, प्रतिनिधी : करमाळा येथील श्री संत नामदेव शिंपी समाजाच्या वतीने श्रीसंत नामदेव शिंपी महाराज…

2 days ago

स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी स्व. रुक्मिणी विठ्ठल आवताडे यांच्या २७ व्या पुण्यस्मरणानिमित विशाल महाराज खोले यांचा ‘आई-वडील हेच खरे दैवत’चा हृदयस्पर्शी संदेश

करमाळा प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेसचे करमाळा तालुकाध्यक्ष तथा पंचायत समिती सदस्य भरत (भाऊ) आवताडे यांच्या…

2 days ago

शाहुनगर पाणीप्रश्नाला मोठा दिलासा; नवीन चार इंची पाईपलाईनच्या कामाचा शुभारंभ उत्साहात नगरपरिषदेचा महत्त्वाकांक्षी उपक्रम

* करमाळा, प्रतिनिधी : करमाळा शहरातील शाहूनगर परिसरातील नागरिकांच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या पाणीप्रश्नाच्या निराकरणाच्या दिशेने…

2 days ago

श्रीजगदंबा कमलादेवी मंदिराच्या जतन संवर्धनासाठी भाविकांचा वाढता प्रतिसाद; विकास चौकटे यांची ₹३,००१ देणगी

करमाळा (प्रतिनिधी) – करमाळा येथील ग्रामदैवत श्रीजगदंबा कमलादेवी मंदिराच्या जतन व संवर्धनाच्या कामाला भाविकांचा उत्स्फूर्त…

3 days ago

संजय गांधी निराधार योजनेची प्रकरने चार महिन्यापासून मंजूर झाली नाहीत तत्काळ मंजूर करा अन्यथा आंदोलन करू – राजाभाऊ कदम

करमाळा प्रतिनिधी : संजय गांधी निराधार योजनेची प्रकरणे मार्च महिन्यामध्ये मंजूर झाली होती त्यानंतर चार…

3 days ago

ग्रामीण विद्यार्थ्यांच्या इंग्रजी अभिव्यक्तीला जिल्हास्तरीय व्यासपीठ* *लोकशिक्षिका स्व. लीलाताई दिवेकर यांच्या स्मरणार्थ करमाळ्यात उद्या वक्तृत्व स्पर्धा

करमाळा प्रतिनिधी भाषा ही केवळ परीक्षेतील गुणांची बाब नसून विद्यार्थ्यांच्या विचारांना आकार देणारे आणि जगाशी…

4 days ago