करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील पश्चिम भागातील केत्तुर नं १,केत्तुर नं २,पारेवाडी, दिवेगव्हाण,गोयेगाव, पोमलवाडी, हिंगणी, खातगाव, जिंती, टाकळी, रामवाडी,कावळवाडी,वाशिंबे, उंदरगाव, मांजरगाव, कोर्टी, सावडी,देलवडी,घरत वाडी, कुंभारगाव, इत्यादी गावात मोठ्या स्वरूपात पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून केळी,डाळिंब,कांदा, मका, बाजरी, सोयाबीन, उडीद, सुर्यफुल,वांगी,टोमँटो,भाजीपाला या पिकांचे अतोनात न भरून येणारे नुकसान झाले असून यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक भुरदंड सोसावा लागत आहे . सातत्याने रोजची रोज होत असलेल्या पावसामुळे पुढील हंगाम सुद्धा शेतकऱ्यांच्या हातातून निघून चाललेला आहे. तसेच ऊस तोडणी साठी आलेल्या ऊसतोड कामगारांची सुद्धा हाल होत आहेत.पाऊसाने रस्ते वाहून गेल्यामुळे ऊस तोड हंगाम ही लांबणीवर जात आहे. अतिरिक्त पावसाने झालेल्या नुकसानामुळे प्रशासनाने त्वरीत पंचनामे करावेत अशी मागणी युवा कार्यकर्ते लक्ष्मीकांत पाटील यांनी सोलापूर चे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील,मा. जिल्हाधिकारी साहेब सोलापूर, आमदार संजयमामा शिंदे, माजी आमदार नारायण पाटील यांचे कडे निवेदनाद्वारे केले आहे.
करमाळा प्रतिनिधी: अखंड हिंदुस्तानचे दैवत म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त करमाळा शहरात…
करमाळा प्रतिनिधी: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जेऊर येथे शिवजन्मोत्सव समितीची स्थापना उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात…
करमाळा प्रतिनिधी बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांना विधान परिषदेवर संधी द्यावी अशी मागणी आपण…
* करमाळा प्रतिनिधी डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे संस्थापक महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा.श्री. राजा माने…
करमाळा प्रतिनिधी विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड यांचे वडील, कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे…
करमाळा प्रतिनिधी: विद्या विकास मंडळचे अध्यक्ष तथा यशवंतराव चव्हाण महाविद्यालयांशी संबंधित नामदेवराव जगताप अध्यापक विद्यालयाचे…