विकासाच्या वाटा दाखविणारे लेखक. श्री. संतोष बिनवडे आणि श्री. गणेश सानप लिखित “सरपंच” हे पुस्तक दिशादर्शक ठरेल

केत्तुर प्रतिनिधी- मौजे केत्तुर येथिल रहीवाशी पत्रकारिता क्षेत्रात पुणे येथे कार्यरत असणाऱ्या लेखिका सौ. भावना बाठीया- संचेती यांनी ग्रामपंचायत केत्तुर येथे दिपावली पाडव्याच्या मुहुर्तावर लेखक संतोष बिनवडे व गणेश सानप यांनी लिहीलेल्या सरपंच या पुस्तकाचे दिपावली भेट स्वरूपात वितरण केले.. या प्रसंगी सरपंच विलास कोकणे, माजी सरपंच उदयसिंह मोरे- पाटील, माजी सरपंच, अॅड अजित विघ्ने, माजी सरपंच, सुहासशेठ निसळ, माजी उपसरपंच व शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाळासाहेब जरांडे, ग्रा.पं. सदस्य लक्ष्मण खैरे, जयकुमार बाठीया, हर्षकुमार बाठिया, पत्रकार राजाराम माने, संतोष ऊर्फ पिंटु कानतोडे, अजिनाथ कनिचे व अन्य ग्रामस्थ उपस्थित होते… यावेळी सरपंच या पुस्तकातुन कंदर.ता- करमाळा गावच्या सरपंच सौ. मनिषाताई भांगे यांचेसह महाराष्ट्रातील अनेक जिल्हयातील सरपंचानी केलेल्या विकासकामांची माहीती व त्या अनुषंगाने आपल्याही गावागावात कोणत्या आणि कशा योजना राबविता येतील आणि गावे समृद्ध होतील याबाबतची सविस्तर माहीती देऊन, लेखकांचा परिचय देखिल देण्यात आला.. यावेळी लेखक संतोष बिनवडे यांनी अमेरिकेतुन व्हीडीओ कॉन्फरन्स द्वारे या कार्यक्रमात सहभाग नोंदविला आणि उपस्थितांचे आभारही मानले… लेखक संतोष बिनवडे हे सध्या अमेरिकेतील एका उच्चभ्रु कंपनीत मॅनेजरपदी कार्यरत असुन, त्यांचा वंजारवाडी ता- करमाळा ते अमेरिका हा प्रवास थक्क करणारा आहे. अतिशय हालाखीचे परिस्थितीतुन कष्ट करून त्यानी शिक्षण घेतले.. लागेल ती कामे करून त्यांनी स्वतःला सिद्ध केले.. आज ते अमेरिकेत जरी असले तरी त्यांना खेड्याविषयी , ग्रामिण भागाचे कुतुहुल आहे.. डिजिटल भारतात आज देखिल शहरे फुगत चालली असुन खेडी ओस पडत आहेत.. त्यामुळे खेडी सुधारली तरच देशाचा खरा विकास होईल या विचाराने त्यांनी महाराष्ट्रातील आकरा निवडक सरपंचाचे कामांचा सरपंच पुस्तकातुन आढावा घेतलेला आहे.. आजही खेडोपाडी रस्ते, पाणी, शौचालय, वीज याबाबत समस्या आहेत, याबाबत अजुनही खेडी स्वयंपूर्ण नाहीत, खेडयात अजुनही रोजगार आणि शिक्षणाचे प्रश्न आहेत.. यासाठी गावातील सरपंच, उपसरपंच, सदस्य, नागरिक यांनी राजकारण विरहीत एकत्रित येऊन आपल्या गावाला समृद्ध कसे करता येईल याबाबत चे मार्गदर्शन , माहीती या पुस्तकातुन मांडली आहे.. या वेळी लेखिका सौ. भावना बाठीया संचेती यांचा ग्रामपंचायत केत्तुर यांचे वतीने यथोचित सन्मान करण्यात आला.

saptahikpawanputra

Recent Posts

शासकीय दाखले देण्यासाठी प्रत्येक विद्यालयात कॅम्प घ्या – गणेश चिवटे यांची मागणी

  करमाळा (प्रतिनिधी) – ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शालेय प्रवेशासाठी आवश्यक असणाऱ्या शासकीय दाखल्यांसाठी होणारी गैरसोय…

8 hours ago

करमाळा तालुक्यात मतदार यादी अचूक करण्यासाठी SIR मॅपिंग मोहिमेला वेग; तहसीलदार शिल्पाताई ठोकडे यांचे नागरिकांना सक्रिय सहभागासाठी आवाहन

करमाळा प्रतिनिधी. करमाळा विधानसभा मतदारसंघात सखोल मतदार पुनर्निरीक्षण (SIR) कार्यक्रम अंतर्गत मतदार यादी अचूक करण्यासाठी…

18 hours ago

करमाळ्यात 15 ते 21 मे दरम्यान स्नेहगंगामाई आळंदीकर यांच्या शिव महापुराण कथेचे भव्य आयोजन – श्रेणिकशेठ खाटेर*

* करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील भागवत कथा ज्ञानयज्ञ समिती व संत गजानन महाराज मंदिर समिती…

2 days ago

खासगी शाळेच्या संदर्भात चुकीची अफवा पसरवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार – जिल्हा अध्यक्ष संभाजी घाडगे

सोलापूर प्रतिनिधी शासनाच्या पगारी घेणाऱ्या सर्व शिक्षकांनी नेमणुकीच्या ठिकाणी राहणे अपेक्षित आहे असे होत नाही…

2 days ago

नामसाधना मॉडर्न स्कूलमध्ये ‘हॉर्स रायडिंग’चा दिमाखात शुभारंभ; जागतिक दर्जाच्या क्रीडा सुविधांसह प्रवेश प्रक्रिया सुरू!

​ ​करमाळा प्रतिनिधी  शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील नामांकित 'नामसाधना मॉडर्न स्कूल'…

2 days ago

डिजिटल मीडियाच्या ४ मे रोजी पणजी गोवा येथे होणाऱ्या महा अधिवेशनाच्या तयारीची राजा माने यांनी केली पाहणी

  पणजी /प्रतिनिधी डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या तिसऱ्या पणजी गोवा येथे ४ मे २०२६…

4 days ago