केत्तूर (अभय माने ) दिवाळीच्या एक दिवस अगोदर परतीच्या पावसाने विश्रांती घेतल्यानंतर लगेचच गुलाबी थंडीला सुरुवात झाली. सध्या दुपारी उन्हाचा चटका आणि रात्री व पहाटे चांगलीच हुडहुडी जाणवत आहे रात्रीच्या कमाल तापमानात घट होत आहे.
सध्या नोव्हेबर हिटचे वातावरण त्यामुळे जाणवत आहे .दिवसभर उन्हात चटका वाढल्यामुळे दिवसभर पंख्याची घर घर वाढली आहे तर रात्रीची ही घर घर बंद होत आहे.
ऋतू बदलाचा परिणाम आरोग्यावर
वातावरणातील बदलामुळे दम्याचे व श्वसनाचे विकार वाढत आहेत सध्या पहाटे व रात्री थंडी आणि दुपारी ऊन या वातावरणाचा परिणाम आजाराच्या ऋतुचक्रावरही झाला आहे त्यामुळे खोकला अंगदुखी घशाची विकार आदीचे रुग्ण वाढत आहेत.
“विषाणू वाढीसाठी हे वातावरण पोषक आहे त्यामुळे सर्दी, खोकला, ताप, डोकेदुखी यासारखे रुग्ण वाढत आहेत. बदलत्या वातावरणामुळे होणारा खोकला आठ ते दहा दिवस राहत आहे लहान मुले व वृद्धांची काळजी घेणे गरजेचे आहे.
– डॉ. जिनेन्द्र दोभाडा, केत्तूर
–
करमाळा : प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराज तरुण मंडळ गणेशोत्सव २०२६ समितीच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड…
करमाळा प्रतिनिधी महाराष्ट्र इंग्लिश मीडियम ट्रस्टीज असोसिएशन एफच्या तालुकाध्यक्षपदी जयंत दळवी यांची नियुक्ती करण्यात आली…
करमाळा : प्रतिनिधी : कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे कर्तव्यनिष्ठ मुख्याध्यापक श्री. सुनील जनार्दन जाधव यांना…
करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवानिमित्त गजानन सोशल अँड स्पोर्ट्स क्लब, करमाळा यांच्या वतीने बुधवार, दि.…
करमाळा प्रतिनिधी : - शेतकऱ्याच्या जीवनात बैलाला केवळ शेतीकामातील पशुधन म्हणून नव्हे, तर कुटुंबातील…
करमाळा: प्रतिनिधी शेतकऱ्यांना रासायनिक खते पारदर्शक आणि सुलभ पद्धतीने उपलब्ध व्हावीत, तसेच खतांच्या विक्रीतील काळाबाजार,…