करमाळा प्रतिनिधी
दि.23 नोव्हेंबर शेतीपंपाची लाईट सुरळीत करावी म्हणून जनशक्ती संघटनेकडून वीज वितरण महामंडळ, तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन करमाळा,यांना देण्यात आले असुन, ओला दुष्काळ पडल्यामुळे शेतकरी आधीच हैराण झाला आहे. हाता तोंडाची आलेली पिक जळण्याच्या आणि होरपळण्याच्या मार्गावर आहेत. अनेक शेतकऱ्यांचे ऊस कारखान्याला जाणार आहेत. अशा परिस्थितीत वीज कनेक्शन कट केले तर उसाचे वजन कमी भरेल. त्यामुळे शेतकऱ्यांची वीज पूर्ववत करा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा जनशक्ती संघटनेचे अतुल खूपसे पाटील यांनी एका निवेदनाद्वारे दिला.
निवेदनातून काही प्रमुख मागण्या जनशक्ती संघटनेकडून मांडण्यात आल्या आहेत ,ह्यापैकी प्रथमतः संपूर्ण वीज बिल माफी झाली पाहिजे.चालू असलेली वीज तोडीची मोहीम थांबवावे, आदेश तत्काळ महावितरणने दिले पाहिजेत . अतिवृष्टीमुळे शेतकरी अडचणीत आले आहेत.
महावितरण कडून चालू झालेली वीज वसुली तत्काळ बंद झाली पाहिजे.ज्या शेतकऱ्यांच्या शेतीपंपाची वीज कनेक्शन महावितरणने कट केले आहे ते त्यांनी तात्काळ जोडून वीज पुरवठा सुरळीत करावा. अनेक मागण्यांसाठी आज निवेदन देण्यासाठी गणेश वायभासे, अतुल राऊत,शरद एकाड,बालाजी तरंगे,किशोर शिंदे,रामराजे डोलारे ,अजीज सय्यद,साहेबराव इतकर,बालाजी तरंगे,अक्षय देवडकर,कल्याण गवळी ,नवनाथ ढेरे,कैलास ढेरे,नयन मस्के,अक्षय मस्के,चंदू डोलारे,ऋषी जगदाळे ,राणा वाघमारे,बंडू शिंदे उपस्थित होते.
▪️
करमाळा प्रतिनिधी बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांना विधान परिषदेवर संधी द्यावी अशी मागणी आपण…
* करमाळा प्रतिनिधी डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे संस्थापक महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा.श्री. राजा माने…
करमाळा प्रतिनिधी विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड यांचे वडील, कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे…
करमाळा प्रतिनिधी: विद्या विकास मंडळचे अध्यक्ष तथा यशवंतराव चव्हाण महाविद्यालयांशी संबंधित नामदेवराव जगताप अध्यापक विद्यालयाचे…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील विद्या विकास मंडळ संचलित यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात महाराष्ट्र राज्य माध्यमिक व…
करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहराची हद्दवाढ करून शहरालगत विकसित झालेल्या ग्रामीण भागाचा नगरपरिषदेच्या हद्दीत समावेश…