गायरान जमिनीवरील निवासी वास्तव्य नियमाधीन करण्यासाठी शासनाला भाग पाडू- सरपंच डॉ.अमोल दुरंदे, सरपंच परिषद

 

करमाळा  प्रतिनिधी

ग्रामीण भागातील कोणत्याही लोकांना बेघर होऊ देणार नाही.राज्याने गायरानावरील घरे हटविण्याबाबत घेतलेला निर्णय मागे घेण्यासाठी करमाळा सरपंच परिषदेचे तालुकाध्यक्ष सरपंच डॉ. अमोल दुरंदे यांचे नेतृत्वाखाली अतिक्रमण धारकांची राजुरी ग्रामपंचायत मध्ये विचार विनिमय बैठक झाली. या बैठकीमध्ये निवासी घरे नियमित करावीत व गावठाणाची हद्दवाढ करावी असे दोन ठराव सर्वानुमते समंत करण्यात आले. सरपंच परिषदेच्या वतीने राज्यातील 23 हजार ग्रामपंचायतीचे ठराव मा.पंतप्रधान व मुख्यमंत्री यांना पाठविण्यात येणार आहे.

राज्यातील शेकडो खेडेगावांमधील गावठाण जमिनींवर व गायरान जमिनींवर निवासाच्या गरजेपोटी स्थानिक ग्रामस्थांनी कच्च्या व पक्क्या स्वरूपात घरी बांधलेले आहेत. ब्रिटिश काळात निर्धारित झालेल्या गावठाण जमिनी अपुऱ्या पडत असल्यामुळे गायरान जमिनीवर हा निवास झाला आहे. गायरान जमिनींचा निवासी प्रयोजनाचा वापर नियमित करण्याबाबत शासनाकडून वारंवार सूचना व आदेश दिलेले आहेत. तथापि प्रशासनाच्या अनास्थेमुळे गायरान जमिनींवर बांधलेली घरे व निवासी वापर नियमाधीन झालेला नाही त्यामुळे शासनाच्या आदेशाचे स्थानिक प्रशासनाकडून उल्लेखन होत आहे. सर्वोच्च न्यायालयातील प्रकरणामुळे गेल्या अनेक पिढ्यांपासून गावरान जमिनीवर असलेला ग्रामस्थांचा निवारा हिरावून घेतला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे लाखोच्या संख्येने कुटुंबावर बेघर होण्याची वेळ येत आहे. सदर बाब या लोककल्याणकारी राज्यात योग्य नाही लोकांवर ही वेळ प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे आलेली आहे. त्यामुळे शासनाने गायरान जमिनीवरील निवासी वापर तातडीने नियमाधीन करण्याबाबत आदेश यावेत अशी मागणी सरपंच परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे.यावेळी ग्रामपंचायत सदस्य व गावातील बहुसंख्य अतिक्रमण धारक उपस्थित होते.

saptahikpawanputra

Recent Posts

बार्शीचे मा.आमदार राजाभाऊ राऊत यांना विधानपरिषदेवर संधी द्यावी – माजी आमदार जयवंतराव जगताप

करमाळा प्रतिनिधी बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांना विधान परिषदेवर संधी द्यावी अशी मागणी आपण…

3 hours ago

डिजिटल मिडिया पत्रकार संपादक संघटनेचे अध्यक्ष राजा माने यांना दुबईत “पत्रकाररत्न” आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मान

* करमाळा प्रतिनिधी डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे संस्थापक महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा.श्री. राजा माने…

9 hours ago

यशवंत परिवाराच्या वतीने स्व. अर्जुन तात्या फंड सर यांना भावपूर्ण श्रद्धांजली

करमाळा प्रतिनिधी विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड यांचे वडील, कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे…

19 hours ago

विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड यांना पितृशोक; अर्जुन तात्या फंड सर यांचे दुःखद निधन

करमाळा प्रतिनिधी: विद्या विकास मंडळचे अध्यक्ष तथा यशवंतराव चव्हाण महाविद्यालयांशी संबंधित नामदेवराव जगताप अध्यापक विद्यालयाचे…

23 hours ago

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात बारावीची परीक्षा उत्साहात; ११०४ विद्यार्थी केंद्रावर परीक्षार्थी

करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील विद्या विकास मंडळ संचलित यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात महाराष्ट्र राज्य माध्यमिक व…

1 day ago

करमाळा शहर हद्दवाढीची भाजप नगरसेविका सौ. स्वाती महादेव फंड यांची मागणी; व्होटकर पुल–श्रीदेवीचामाळ रस्ता नगरपरिषदेकडे देण्याचा प्रस्ताव*

करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहराची हद्दवाढ करून शहरालगत विकसित झालेल्या ग्रामीण भागाचा नगरपरिषदेच्या हद्दीत समावेश…

2 days ago