करमाळा प्रतिनिधी
ग्रामीण भागातील कोणत्याही लोकांना बेघर होऊ देणार नाही.राज्याने गायरानावरील घरे हटविण्याबाबत घेतलेला निर्णय मागे घेण्यासाठी करमाळा सरपंच परिषदेचे तालुकाध्यक्ष सरपंच डॉ. अमोल दुरंदे यांचे नेतृत्वाखाली अतिक्रमण धारकांची राजुरी ग्रामपंचायत मध्ये विचार विनिमय बैठक झाली. या बैठकीमध्ये निवासी घरे नियमित करावीत व गावठाणाची हद्दवाढ करावी असे दोन ठराव सर्वानुमते समंत करण्यात आले. सरपंच परिषदेच्या वतीने राज्यातील 23 हजार ग्रामपंचायतीचे ठराव मा.पंतप्रधान व मुख्यमंत्री यांना पाठविण्यात येणार आहे.
राज्यातील शेकडो खेडेगावांमधील गावठाण जमिनींवर व गायरान जमिनींवर निवासाच्या गरजेपोटी स्थानिक ग्रामस्थांनी कच्च्या व पक्क्या स्वरूपात घरी बांधलेले आहेत. ब्रिटिश काळात निर्धारित झालेल्या गावठाण जमिनी अपुऱ्या पडत असल्यामुळे गायरान जमिनीवर हा निवास झाला आहे. गायरान जमिनींचा निवासी प्रयोजनाचा वापर नियमित करण्याबाबत शासनाकडून वारंवार सूचना व आदेश दिलेले आहेत. तथापि प्रशासनाच्या अनास्थेमुळे गायरान जमिनींवर बांधलेली घरे व निवासी वापर नियमाधीन झालेला नाही त्यामुळे शासनाच्या आदेशाचे स्थानिक प्रशासनाकडून उल्लेखन होत आहे. सर्वोच्च न्यायालयातील प्रकरणामुळे गेल्या अनेक पिढ्यांपासून गावरान जमिनीवर असलेला ग्रामस्थांचा निवारा हिरावून घेतला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे लाखोच्या संख्येने कुटुंबावर बेघर होण्याची वेळ येत आहे. सदर बाब या लोककल्याणकारी राज्यात योग्य नाही लोकांवर ही वेळ प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे आलेली आहे. त्यामुळे शासनाने गायरान जमिनीवरील निवासी वापर तातडीने नियमाधीन करण्याबाबत आदेश यावेत अशी मागणी सरपंच परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे.यावेळी ग्रामपंचायत सदस्य व गावातील बहुसंख्य अतिक्रमण धारक उपस्थित होते.
करमाळा, प्रतिनिधी : करमाळा येथील श्री संत नामदेव शिंपी समाजाच्या वतीने श्रीसंत नामदेव शिंपी महाराज…
करमाळा प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेसचे करमाळा तालुकाध्यक्ष तथा पंचायत समिती सदस्य भरत (भाऊ) आवताडे यांच्या…
* करमाळा, प्रतिनिधी : करमाळा शहरातील शाहूनगर परिसरातील नागरिकांच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या पाणीप्रश्नाच्या निराकरणाच्या दिशेने…
करमाळा (प्रतिनिधी) – करमाळा येथील ग्रामदैवत श्रीजगदंबा कमलादेवी मंदिराच्या जतन व संवर्धनाच्या कामाला भाविकांचा उत्स्फूर्त…
करमाळा प्रतिनिधी : संजय गांधी निराधार योजनेची प्रकरणे मार्च महिन्यामध्ये मंजूर झाली होती त्यानंतर चार…
करमाळा प्रतिनिधी भाषा ही केवळ परीक्षेतील गुणांची बाब नसून विद्यार्थ्यांच्या विचारांना आकार देणारे आणि जगाशी…