करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यामध्ये अतिवृष्टीने शेतकऱ्याची तुर उडीद सोयाबीन मका बाजरी पिकांचे मोठे नुकसान झाले असुन या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकाची पंचनामे करण्यात आले असुन करमाळा तालुक्यातील शेतकरी अद्याप मदतीपासुन वंचित आहे. करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांना ताबडतोब मदत मिळावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष नानासाहेब मोरे यांनी केली आहे.करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची मदत मिळाली नाही.बार्शी अक्कलकोट दक्षिण सोलापूर मद्रुंप या तालुक्यांतील शेतकऱ्यांना मदत जाहीर झाली आहे परंतु करमाळा तालुक्याला यामधून वगळण्यात आलेले आहे त्यामुळे करमाळा तालुक्यातील शेतकरी वर्ग नाराज असून करमाळा तालुक्यातील शेतकऱ्याला अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने आंदोलन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. . अतिवृष्टीने करमाळा तालुक्यातील तुर उडीद सोयाबीन मका बाजरी पिकांचे नुकसान झालेले आहे त्या सर्व शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करण्यात आले असून शासनाला त्याचा अहवाल सादर करण्यात आला आहे शासनाकडून लवकरच करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांना मदत जाहीर होणार आहे याबाबत आमचा पाठपुरावा चालू असून करमाळा तालुक्यातील शेतकऱ्याला नक्की मदत मिळणार असल्याचे तहसीलदार समीर माने यांनी सांगितले आहे. समीर तहसीलदार करमाळा.
करमाळा प्रतिनिधी श्रीदेवीचा माळ येथील श्री जगदंबा कमलादेवी मंदिरात सहस्र श्री दुर्गा सप्तशती पाठ सेवेचे…
करमाळा प्रतिनिधी करमाळा–कुर्डूवाडी–नेरले मार्गावर सुरू असलेली एसटी बससेवा अचानक बंद झाल्याने नेरले परिसरातील नागरिक, विद्यार्थी…
करमाळा प्रतिनिधी : कमला भवानी बहुउद्देशीय संस्था, करमाळा यांच्या वतीने पं. के. एन. बोळंगे…
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील बसस्थानक परिसरात प्रवाशाच्या पर्समधून चोरीस गेलेल्या सुमारे १० लाख ५ हजार…
करमाळा प्रतिनिधी सात मिनिटांत 100 गणिते सोडविण्याच्या स्पर्धेत विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी; प्रथम ते सहाव्या…
करमाळा प्रतिनिधी श्रावण महिना हा भगवान महादेवाच्या भक्तीचा आणि उपासनेचा महिना मानला जातो. या पवित्र…