सोलापूर जिल्ह्यात बोगस खत कंपन्यांचा सुळसुळाट  अनावश्यक खते शेतकऱ्यांच्या माथी मारण्याचा दुकानदारांचा प्रयत्न 2 डिसेंबर रोजी हलगीनाद आंदोलन करण्याचा जनशक्तीने दिला इशारा

 

करमाळा प्रतिनिधी

कृषी विभागातील गुण नियंत्रण विभाग, खत दुकानदार, आणि खत कंपन्या यांची आर्थिक सांगड असल्याने कृषी विभाग बोगस कंपन्यांना पाठीशी घालत खत दुकानदार बोगस खते शेतकऱ्यांच्या माथ्यावर मारण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहेत. शिवाय एका सोबत दोन घ्या अशा अशा स्कीम मुळे शेतकऱ्यांना अतिशय त्रास होत आहे. या स्कीम मुळे आणि बोगस खतांमुळे दुकानदार मालामाल आणि शेतकरी कंगाल अशी परिस्थिती झाली असून कृषी विभागाने याकडे लक्ष द्यावे अन्यथा २ डिसेंबर रोजी जिल्हा कृषी कार्यालय येथे बेमुदत हलगीनाथ आंदोलन करण्याचा इशारा जनशक्ती संघटनेचे अतुल खूपसे पाटील यांनी दिला.

या दिलेले निवेदनात पुढे ते म्हणाले की, सोलापूर जिल्ह्यातील जवळपास सर्रास दुकानांमध्ये बोगस खतांची विक्री मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. ह्या कंपनीदेखील सोलापूर जिल्ह्यात उदयास आले आहेत. लिंबोळी पासून बनवणारे खत, जैविक खत, पी डी एम पोटॅश खत असे अनेक खते कुठल्याही लॅब मध्ये चेक न करता आकर्षित पॅकिंग करून त्याच्यावर खोटी टक्केवारीची मात्रा लिहिली जाते. दुकानदारांना माहिती असून देखील तो अशा बनावट पॅकिंगच्या वस्तू विक्रीसाठी ठेवतो. यामुळे शेतकऱ्यांची मोठी आर्थिक फसवणूक होते.

एकीकडे ओल्या दुष्काळामुळे शेतकरी घायकुतीला आला आहे. तर दुसरीकडे बोगस खते आणि लिंकिंग खते देऊन शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड लावण्याचा प्रकार दुकानदारांमधून होत आहे. या परिस्थितीमुळे दुकानदार चांगलेच मालामाल होताना दिसत आहेत तर शेतकरी यामुळे देशी दढीला लागल्याने कंगाल होत आहे.

सोलापूर जिल्ह्यातील अशा दुकानदारावर कृषी कार्यालयाने वेळोवेळी लक्ष ठेवून प्रसंगी कारवाई करून दुकाने सील केली पाहिजे. मात्र कृषी विभाग, बोगस खत कंपन्या आणि खत दुकानदार यांची आर्थिक सांगड असल्याने तेरी ‘भी चुप मेरी भी चुप’ असा प्रकार सुरू आहे. त्यामुळे दिवसाढवळ्या शेतकऱ्यांच्या डोक्यात दगड घालण्याचे प्रकार होत आहे. अशा बोगस कंपन्या आणि खत दुकानदाराकडे जिल्हा कृषी कार्यालय आणि तालुक्यातील तालुका कृषी कार्यालयाने लक्ष द्यावे आणि त्यांच्यावर कारवाई करावी. अन्यथा २ डिसेंबर रोजी जिल्हा कृषी कार्यालयाच्या बाहेर बेमुदत हलगी नाद आंदोलन करणार असल्याचा इशारा जनशक्ती संघटनेचे अतुल खूपसे पाटील यांनी दिला आहे.

यावेळी गणेश वायभासे, अतुल राऊत,शरद एकाड,बालाजी तरंगे,किशोर शिंदे,रामराजे डोलारे ,अजीज सय्यद,साहेबराव इतकर,बालाजी तरंगे,अक्षय देवडकर,कल्याण गवळी ,नवनाथ ढेरे,कैलास ढेरे,नयन मस्के,अक्षय मस्के,चंदू डोलारे,ऋषी जगदाळे ,राणा वाघमारे,बंडू शिंदे उपस्थित होते.

▪️

 

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय स्पर्धेत दुहेरी बाजी बुद्धिबळात प्रतीक नामदे तर कुस्तीमध्ये राम सरडे प्रथम

  करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…

18 hours ago

करमाळयात गणेशोत्सवानिमित्त सर्वोदय प्रतिष्ठानची तीन दिवसीय व्याख्यानमाला अरविंद जगताप, देवा झिंजाडे, प्रभाकर साळेगावकर यांची व्याख्याने; १९ ते २१ सप्टेंबरदरम्यान आयोजन

करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…

21 hours ago

दोन-तीन वाडे होते… पण स्वप्न मोठे होते; साखरे सरांनी घडविला राजुरीचा शैक्षणिक इतिहास! शिक्षकांच्या सामर्थ्यापुढे भव्य इमारतीही फिक्या; प्रा. डॉ. राजेंद्र दास

करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…

23 hours ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट च्या राम सरडे चा तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक*

*  करमाळा  प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…

2 days ago

सणासुदीच्या काळात करमाळ्यातील सायंकाळचे भारनियमन रद्द करा -दिग्विजय बागल

करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…

2 days ago