करमाळा प्रतिनिधी आपल्या वाचाळ वाणीतून राष्ट्रपुरुषांबद्दल अवमानकारक वक्तव्य करून सामाजिक स्वास्थ्य बिघडवनारांच्या विरोधात थेट राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करून कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी करमाळ्याचे माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचेकडे केली आहे. सध्या राज्यासह देशभरात अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी अपुऱ्या ज्ञानातून अथवा कलुषित मनोवृत्तीतून अपमानकारक वक्तव्य केली जात आहेत. यातून जनतेमध्ये तीव्र स्वरूपात असंतोष आहे. मुळातच भारत देश हा विविध धर्म,जाती,पंथ,संस्कृती,भाषा यासह विविधतेने घडलेला असून देखील सर्व नागरिक गुण्यागोविंदाने राहत आहेत.सध्या देशापुढे शिक्षण,आरोग्य, रोजगार,दैनदिन मुलभूत गरजा आदी जटील प्रश्न उभे असताना याकडे दुर्लक्ष करीत काही असंतुष्ट व्यक्ती थोर राष्ट्रपुरुषांबद्दल अवमानकारक वक्तव्य करून जनतेच्या मनातील भावना कलुषित करून सामाजिक स्वास्थ्य बिघडवत आहेत.तरी यापुढे छत्रपती शिवाजी महाराज वा अन्य राष्ट्रपुरुष,साधू-संत,देवी-देवता अथवा धर्माबद्दल अपुऱ्या वाचनातून ,ज्ञानातून अवमानकारक वक्तव्य करणारे मग ते कितीही उच्च पदस्थ अधिकारी,पदाधिकारी अथवा सामान्य नागरिक असो त्यांच्या विरोधात थेट राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करून कडक कारवाई करावी. वेळ पडल्यास येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात विधेयक आणून थेट कायदाच करावा अशी करमाळ्याचे माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे केली आहे.
करमाळा प्रतिनिधी श्रीदेवीचा माळ येथील श्री जगदंबा कमलादेवी मंदिरात सहस्र श्री दुर्गा सप्तशती पाठ सेवेचे…
करमाळा प्रतिनिधी करमाळा–कुर्डूवाडी–नेरले मार्गावर सुरू असलेली एसटी बससेवा अचानक बंद झाल्याने नेरले परिसरातील नागरिक, विद्यार्थी…
करमाळा प्रतिनिधी : कमला भवानी बहुउद्देशीय संस्था, करमाळा यांच्या वतीने पं. के. एन. बोळंगे…
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील बसस्थानक परिसरात प्रवाशाच्या पर्समधून चोरीस गेलेल्या सुमारे १० लाख ५ हजार…
करमाळा प्रतिनिधी सात मिनिटांत 100 गणिते सोडविण्याच्या स्पर्धेत विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी; प्रथम ते सहाव्या…
करमाळा प्रतिनिधी श्रावण महिना हा भगवान महादेवाच्या भक्तीचा आणि उपासनेचा महिना मानला जातो. या पवित्र…