करमाळा प्रतिनिधी शाळेत फक्त पुस्तकी ज्ञानमिळवणे म्हणजे शिक्षण नाही तर जीवन जगताना येणाऱ्या अडचणी स्वतः सोडवण्या चे ज्ञान असणे गरजेचे असून ते ज्ञान शालेत देता आले पाहिजे. असे उपक्रम शालेत राबवले पाहिजेत असे मत मुख्याध्यापक श्री सुनिल शिंदे यांनी व्यक्त केले आहे ते जिल्हा परिषद प्राथ खंबेवाडी या शाळेच्या आनंद बाजार या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.पुढे बोलताना त्यांनी सांगितले कि या शाळेचे पाटील सर व गायकवाड मॅडम हे दोघेही उपक्रमशील शिक्षक आहेत. त्यांनी इयत्ता चौथी मध्ये पहिला दुसरा, व तिसरा येणाऱ्या विध्यार्थ्यांना अनुक्रमे 501,301,201 अशी बक्षीसे जाहीर केली.विशेष म्हणजे ऊस तोडणी साठी आलेल्या मुलांना देखील या बाल मेळाव्यात सहभागी केले होते.
यावेळी शाळा व्यवस्थापक समितीचे अध्यक्ष सुशील नरुटे,ग्रामपंचायत पांडे च्या सरपंच सौं अनिता मोटे, सदस्य लांडगे, सदस्य सौं सुकेशिनी खटके, अंगणवाडी सेविका इंदुमती देवकते, बानू मोटे, स्वाती गोरे, सोमा नरुटे, आबा टकले, सुधीर वयकुळे, शोभा गोफने, वंदना शिंदे, सुमन कांबळे,बाळासाहेब कोळेकर, अण्णासाहेब सुपवर, झुंबर नरुटे, कांबळे, पत्रकार राजेश गायकवाड उपस्थित होते.
करमाळा प्रतिनिधी: अखंड हिंदुस्तानचे दैवत म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त करमाळा शहरात…
करमाळा प्रतिनिधी: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जेऊर येथे शिवजन्मोत्सव समितीची स्थापना उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात…
करमाळा प्रतिनिधी बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांना विधान परिषदेवर संधी द्यावी अशी मागणी आपण…
* करमाळा प्रतिनिधी डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे संस्थापक महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा.श्री. राजा माने…
करमाळा प्रतिनिधी विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड यांचे वडील, कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे…
करमाळा प्रतिनिधी: विद्या विकास मंडळचे अध्यक्ष तथा यशवंतराव चव्हाण महाविद्यालयांशी संबंधित नामदेवराव जगताप अध्यापक विद्यालयाचे…