Categories: Uncategorized

आता एकाच वेळी सहा विद्यापीठांची पदवी आपण घेऊ शकतो – चंद्रकांत पाटील यांची सभागृहात माहिती

 

नागपूर : हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नवीन शैक्षणिक धोरणाविषयी माहिती दिली. देशात स्वायत्त महाविद्यालये आणि स्वायत्त विद्यापीठ तयार व्हावेत, हा आग्रह पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी धरला होता. यापूर्वी एकावेळी एकाच विद्यापीठाची पदवी आपण घेऊ शकत होतो, मात्र आता एकाच वेळी सहा विद्यापीठांची पदवी आपण घेऊ शकतो, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी सभागृहात दिली. 

चंद्रकांत पाटील यांनी यावेळी म्हटले कि, महाराष्ट्रामध्ये नवीन शैक्षणिक धोरणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जो आग्रह धरला कि, हळूहळू स्वायत्त महाविद्यालय आणि स्वायत्त विद्यापीठ तयार व्हावीत कि ज्यामुळे अभ्यासक्रमातील म्हणजे एकच अभ्यासक्रम वर्षांनुवर्षे शिकवले जातात हा जो भाग आहे त्यामध्ये प्रयोगांना परवानगी देण्यात आली.  ज्यामध्ये आता १२ वी नंतर  तीन वर्षाची डिग्री आता चार वर्षांची करण्यात आली आहे. ज्यामध्ये मल्टी एंन्ट्री आणि मल्टी एक्सिट ठेवली आहे. यामध्ये दोन वर्ष तुम्ही अभ्यासक्रम थांबवून काही वर्षांच्या गॅप नंतर पुन्हा अभ्यासक्रम जॉईन  करू शकता. दोन वर्षांमध्ये तुम्ही जो कोर्स पूर्ण केला त्याचे क्रेडिट तुमच्या डिजिटल लॉकरमध्ये जमा होतात. आता जगातल्या सगळ्या विद्यापीठांचा एमओयू पूर्ण होत आला. ज्याच्या आधारावर आपल्या देशात दोन वर्ष पूर्ण केलेले क्रेडिट घेऊन  परदेशातल्या विद्यापीठामध्ये प्रवेश घेऊ शकता. तुम्ही तिथे पुढचं शिक्षण घेऊ शकता, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. 

एका वेळेला आपण एकाच विद्यापीठाची पदवी घेऊ शकत होतो, आता एका वेळेला तुम्ही सहा सहा विद्यापीठांच्या पदव्या घेऊ शकता. आता ग्रॅज्युएशन नंतर पण पीएचडी करू शकता अशी शिक्षणामध्ये एका अर्थाने सुकरता आणण्याचा जो प्रयत्न सुरु आहे त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जवजवळ १४० कॉलेजेसना स्वायत्त महाविद्यालय म्हणून आपण परवानगी दिली आहे, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.

saptahikpawanputra

Recent Posts

अखंड हिंदुस्तानचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त १९ फेब्रुवारीला करमाळ्यात भव्य रक्तदान शिबीर

करमाळा प्रतिनिधी: अखंड हिंदुस्तानचे दैवत म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त करमाळा शहरात…

13 hours ago

जेऊर येथे शिवजन्मोत्सव समितीची स्थापना; १ मार्च रोजी पारंपरिक पद्धतीने शिवजयंती साजरी होणार-पृथ्वीराज पाटील

करमाळा प्रतिनिधी: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जेऊर येथे शिवजन्मोत्सव समितीची स्थापना उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात…

18 hours ago

बार्शीचे मा.आमदार राजाभाऊ राऊत यांना विधानपरिषदेवर संधी द्यावी – माजी आमदार जयवंतराव जगताप

करमाळा प्रतिनिधी बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांना विधान परिषदेवर संधी द्यावी अशी मागणी आपण…

23 hours ago

डिजिटल मिडिया पत्रकार संपादक संघटनेचे अध्यक्ष राजा माने यांना दुबईत “पत्रकाररत्न” आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मान

* करमाळा प्रतिनिधी डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे संस्थापक महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा.श्री. राजा माने…

1 day ago

यशवंत परिवाराच्या वतीने स्व. अर्जुन तात्या फंड सर यांना भावपूर्ण श्रद्धांजली

करमाळा प्रतिनिधी विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड यांचे वडील, कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे…

2 days ago

विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड यांना पितृशोक; अर्जुन तात्या फंड सर यांचे दुःखद निधन

करमाळा प्रतिनिधी: विद्या विकास मंडळचे अध्यक्ष तथा यशवंतराव चव्हाण महाविद्यालयांशी संबंधित नामदेवराव जगताप अध्यापक विद्यालयाचे…

2 days ago