करमाळा प्रतिनीधी आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या मोळीपूजनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा करमाळा दौ-या रिटेवाडी सिंचन योजना बागल गटाच्या नेत्या रश्मी दिदी बागल यांनी केलेल्या मागणीला मंजूर करण्याचे आश्वासन दिल्यामुळे यशस्वी झाला असल्याची चर्चा होत आहे.
रिटेवाडी सिंचन योजना हा तालुक्याच्या दृष्टीने महत्त्वाची असणारी प्रकल्प योजना आहे. बागल गटाच्या नेत्या रश्मी दिदी बागल यांनी या मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या आदिनाथ कारखाना दौ-यात केलेल्या मागणीला शिंदे यांनी त्वरीत ही योजना मंजूर करुन देण्यात येईल असे आश्वासन दिले. या योजनेमुळे तालुक्यातील मोठ्या क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. सदर योजना मंजूर करण्यासाठी बागल गटाच्या नेत्या रश्मी दिदी बागल यांनी दाखवलेल्या या समयसूचकतेचे या भागातील लोकांकडून समाधान व्यक्त होत आहे.
रिटेवाडी सिंचन योजना हा तालुक्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा विषय आहे. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या पुढे आज आदिनाथ कारखाना मोळी पूजन कार्यक्रमाच्या निमित्ताने रिटेवाडी सिंचन योजना मंजूर करण्यासाठी आपण मागणी केली, या योजनेस आपण त्वरीत मंजूर करत असल्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. यामुळे या योजनेत येणारी गावे ओलिताखाली येतील.
रश्मी दिदी बागल, संचालिका महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघ
करमाळा प्रतिनिधी: अखंड हिंदुस्तानचे दैवत म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त करमाळा शहरात…
करमाळा प्रतिनिधी: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जेऊर येथे शिवजन्मोत्सव समितीची स्थापना उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात…
करमाळा प्रतिनिधी बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांना विधान परिषदेवर संधी द्यावी अशी मागणी आपण…
* करमाळा प्रतिनिधी डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे संस्थापक महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा.श्री. राजा माने…
करमाळा प्रतिनिधी विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड यांचे वडील, कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे…
करमाळा प्रतिनिधी: विद्या विकास मंडळचे अध्यक्ष तथा यशवंतराव चव्हाण महाविद्यालयांशी संबंधित नामदेवराव जगताप अध्यापक विद्यालयाचे…