करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात अहिल्यादेवी सिंचन महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून विहीर मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना अद्यापपर्यंत विहिरीचा लाभ आदेश मिळाला नसल्यामुळे त्यांना न्याय मिळवुन देण्यासाठी सर्व लाभार्थी त्यांचे नातेवाईक यांच्यासह 26 जानेवारीपासून आपल्या कार्यालय समोर आमरण उपोषण करणार असल्याचे निवेदन जिल्हा परिषद सदस्या लक्ष्मीबाई आवटे यांनी गटविकास अधिकारी मनोज राऊत यांना दिले आहे. त्यांनी दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की अहिल्यादेवी सिंचन महात्मा गांधी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना सन 2020- 21 अंतर्गत या योजनेअंतर्गत दोनशे बेचाळीस 242लाभार्थ्यांना विहीर मंजूर करण्यात आलेली आहे सदर विहीर मंजूर होऊन दोन वर्षे होत आहेत तरी देखील अद्यापपर्यंत लाभार्थ्यांना सदरील कामाचे मंजुरी आदेश मिळाले नाहीत व आजपर्यंत त्यांना योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळाल्या नसल्यामुळे आम्ही सर्व लाभार्थी आपल्या कार्यालयासमोर सदरील योजनेच्या कार्यालयामध्ये पर्यंत दिनांक 26 जानेवारी रोजीच्या प्रजासत्ताक दिनापासून सकाळी दहा वाजलेपासून आमरण उपोषण सुरू करणार आहोत तरी याची आपण नोंद घेऊन सगळे योजनेचे कार्यवाही जोपर्यंत आम्हाला मिळणार नाही तोपर्यंत आम्ही सदर उपोषण मागे घेणार नसल्याचे जिल्हा परिषद सदस्या लक्ष्मी आवटे यांनी सांगितले आहे.
करमाळा प्रतिनिधी: अखंड हिंदुस्तानचे दैवत म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त करमाळा शहरात…
करमाळा प्रतिनिधी: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जेऊर येथे शिवजन्मोत्सव समितीची स्थापना उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात…
करमाळा प्रतिनिधी बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांना विधान परिषदेवर संधी द्यावी अशी मागणी आपण…
* करमाळा प्रतिनिधी डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे संस्थापक महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा.श्री. राजा माने…
करमाळा प्रतिनिधी विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड यांचे वडील, कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे…
करमाळा प्रतिनिधी: विद्या विकास मंडळचे अध्यक्ष तथा यशवंतराव चव्हाण महाविद्यालयांशी संबंधित नामदेवराव जगताप अध्यापक विद्यालयाचे…