तीन वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आदिनाथ कारखान्याचे चाक फिरले गळीत जोरदार सुरू दिवसाचा २७०० टनाचा टप्पा पार

करमाळा प्रतिनिधी तीन वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आदिनाथ कारखान्याचे गळीत जोरदार सुरू दिवसाचा २७०० टनाचा टप्पा पार आदिनाथ कारखाना गेल्या तीन वर्षापासून सुरू होण्यासाठी संघर्ष करत होता तीन वर्षाच्या संघर्षानंतर आदिनाथ कारखाना जोमाने सुरू झाला असून आदिनाथ कारखान्यांनी सर्वाधिक 2700 टन गाळपाचा टप्पा काल पार केला असून आदिनाथ कारखाना तीन वर्षाच्या कालावधीनंतर आपल्या पूर्व पदावर येत असून यंदाच्या हंगामामध्ये जरी गाळप कमी झाले असले तरी पुढील वर्षी आदिनाथ कारखाना चार ते पाच लाखाचा गळीताचा टप्पा नक्की पार करेल असे चित्र सध्या दिसत असून यंदा आदिनाथचे चाक फिरले व पूर्ण क्षमतेने चालण्यासाठी आगेकूच करत आहे हे मोठे यश असून आदिनाथ महाराज यांची कृपा आदिनाथ कारखान्यावर झाली असून खऱ्या अर्थाने शेतकरी सभासद याचा हक्काचा कारखाना आदिनाथ म्हणून पुन्हा एकदा शेतकऱ्याचा आधारवड म्हणून भरारी घेणार या शंका नाही आदिनाथ कारखाना सुरू करण्यासाठी आदिनाथ बचाव समिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आरोग्य मंत्री तानाजी सावंत माजी आमदार नारायण पाटील बागल गटाचे नेत्या रश्मी बागल यांचे बचाव समितीचे हरीदास डांगे,प्रा.रामदास झोळ,डाॅ.वसंत पुंडे,यांचे अथक प्रयत्न उपयोगी पडले असून खऱ्या अर्थाने करमाळा तालुक्यामध्ये सहकारी साखर कारखानदारी वाचवण्यासाठी राजकारण एका बाजूला व समाजकारण एका बाजूला ही भावना ठेवून सर्व नेते मंडळींनी राजकीय परिपक्वता दाखवले असून करमाळा तालुक्यामध्ये विकासाचे राजकारण सुरू झाले आहे.आदिनाथ सहकारी कारखान्याचे चेअरमन धनंजय डोंगरे व्हाईस चेअरमन रमेश कांबळे संचालक नितीन जगदाळे डॉक्टर हरिदास केवारे, नानासाहेब लोकरे, दिलीप केकान, लक्ष्मण गोडगे, कार्यकारी संचालक अरूण बागनवर कदमसाहेब सर्व कर्मचारी व कामगार वर्ग तसेच सर्व संचालक मंडळाचे सहकार्य लाभत असून आदिनाथ कारखाना पुन्हा गत वैभव प्राप्त करून करमाळा तालुक्याचे नंदनवन करण्यास समर्थ ठरणार आहे

saptahikpawanputra

Recent Posts

राज्य फेंसिंगच्या रणांगणात कुचन प्रशालेचे तीन शिलेदार! ३४ व्या ज्युनियर राज्य फेंसिंग अजिंक्यपद स्पर्धेत अक्षय पिट्टा, श्वेता विडप व गंधम तुलसी यांचा सहभाग

करमाळा प्रतिनिधी: अमरावती येथे सुरू असलेल्या ३४ व्या ज्युनियर राज्य फेंसिंग अजिंक्यपद स्पर्धा २०२६ मध्ये…

13 hours ago

करमाळा तालुक्यात शेतीपंपांची वीज कपात म्हणजे शेतकऱ्यांना आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा प्रकार शंभूराजे जयवंतराव जगताप यांचा इशारा ​

​करमाळा प्रतिनिधी: गेल्या दोन-तीन वर्षांपासून शेतकरी वर्ग सातत्याने अस्मानी आणि सुलतानी संकटांचा सामना करत आहे.…

16 hours ago

बैलपोळ्यानिमित्त गोसेवेचा जागर; ९० गोमातांच्या सान्निध्यात भक्तिमय सोहळा गुरु गणेश दिव्यरत्न गो-पालन संस्थेत पुरणपोळीचा नैवेद्य, विधिवत गोपूजन अन् गोसेवेचा संदेश

करमाळा प्रतिनिधी बैलपोळा हा केवळ बैलांच्या पूजनाचा सण नसून, कृषीसंस्कृती, पशुप्रेम, कृतज्ञता आणि भारतीय परंपरेतील…

1 day ago

करमाळ्यात ‘ज्ञान माऊली’ सांस्कृतिक उपक्रम उत्साहात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या विचारांचा जागर; बाल वारकऱ्यांपासून दिग्गजांचा सन्मान

  करमाळा प्रतिनिधी : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जन्माचे ७५० वे वर्ष राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरे…

3 days ago