करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरालगत असलेल्या श्री विठ्ठल शुगर रिफाइंड फॅक्टरीचे ( कमलाभवानी शुगर )प्रदुषणामुळे नागरीकांना आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे तरी तातडीने प्रदूषण बंद व्हावे अशी मागणी माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाकडे लेखी निवेदनाव्दारे केली आहे . निवेदनात त्यांनी म्हटले आहे कि,करमाळा शहरालगत श्री .विठ्ठल रिफाइंड शुगर प्रा .लि .पांडे हा साखर कारखाना असून सदर साखर कारखान्याने प्रदूषण नियंत्रण यंत्रणा कार्यान्वित केलेली नसल्याने या कारखान्यातून मोठ्या प्रमाणावर राख व काजळी बाहेर पडून आसपासच्या परिसरात सर्वत्र पसरत आहे . सदर कारखाना शहरालगत व श्री . कमलादेवी मंदीर परीसरा जवळ आहे . या ठिकाणी दाट लोकवस्ती आहे . या फॅक्टरीतून तयार होणाऱ्या राखेचे लोट संपूर्ण शहरात व घराघरांत पडत असून यामुळे नागरीकांना श्वसनाचे आजार बळावले असून सर्वसामान्य जनतेच्या स्वच्छतेचा व आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे . तरी या बाबींची गंभीर दखल घेवून तातडीने या शुगर फॅक्टरीने प्रदूषण नियंत्रण यंत्रणा बसविली आहे काय? असल्यास ती कार्यान्वित आहे का? नसल्यास त्वरीत प्रदूषण बंद करणेबाबतच्या उपाययोजना करणेबाबतच्या आपले स्तरावरून सूचना देवून कार्यवाही करणेत यावी . त्याचबरोबर सदर कारखान्यातून मळी मिश्रीत पाण्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावली जात नसल्यामुळे आसपास मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरत असून परिसरातील पाण्याच्या स्तोत्राचा दर्जा खालावला असून शेतजमिनींचा पोत खराब होत आहे .या बाबींचा गांभीर्याने विचार करून प्रदूषण बंद करणेबाबत कार्यवाही साठी तातडीने आदेश व्हावेत . या निवेदनाच्या प्रती कार्यवाहीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, उप – प्रादेशिक अधिकारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांना दिल्या आहेत .
करमाळा, प्रतिनिधी : करमाळा येथील श्री संत नामदेव शिंपी समाजाच्या वतीने श्रीसंत नामदेव शिंपी महाराज…
करमाळा प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेसचे करमाळा तालुकाध्यक्ष तथा पंचायत समिती सदस्य भरत (भाऊ) आवताडे यांच्या…
* करमाळा, प्रतिनिधी : करमाळा शहरातील शाहूनगर परिसरातील नागरिकांच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या पाणीप्रश्नाच्या निराकरणाच्या दिशेने…
करमाळा (प्रतिनिधी) – करमाळा येथील ग्रामदैवत श्रीजगदंबा कमलादेवी मंदिराच्या जतन व संवर्धनाच्या कामाला भाविकांचा उत्स्फूर्त…
करमाळा प्रतिनिधी : संजय गांधी निराधार योजनेची प्रकरणे मार्च महिन्यामध्ये मंजूर झाली होती त्यानंतर चार…
करमाळा प्रतिनिधी भाषा ही केवळ परीक्षेतील गुणांची बाब नसून विद्यार्थ्यांच्या विचारांना आकार देणारे आणि जगाशी…