प्रतिनिधी वाशिंबे.
युती सरकारच्या काळात स्व. दिगंबरराव बागल यांच्या प्रयत्नाने साडेदहा हजार हेक्टर क्षेत्र ओलीताखाली आणनार्या दहीगाव ऊपसा सिंचन योजनेला मंजुरी मिळून प्रत्यक्ष कामास सुरवात झाली.त्यामुळे या योजनेला स्व. दिगंबरराव बागल यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी बागल गटाचे पश्चिम भागातील युवकनेते गणेश झोळ यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
झोळ यांनी सांगितले की करमाळा तालुक्यातील पुर्व भागातील दुष्काळ हटविण्यासाठी स्व.बागल मामांनी युती सरकारच्या काळात मंत्री पद नाकारुन माझ्या तालुक्यातील शेतकर्यांसाठी दहीगाव ऊपसा सिंचन योजनेला मंजूरी द्यावी अशी आग्रही मागणी तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या कडे केली होती.या योजनेचे महत्त्व जाणून तत्कालीन सरकारने या योजनेला मंजूरी देऊन निधी उपलब्ध केला. स्व.बागलमामा व शामलताई बागल यांच्या कार्यकाळात या योजनेच नव्वद टक्के काम पूर्ण झाले.त्यामुळे बागल मामांचे या योजनेस मोठे योगदान आहे.त्यामुळे या योजनेस त्यांचे नाव देने स्वागतहार्य आहे.तालुक्यातील सर्व पक्षीय नेते याचे स्वागत करतील.
कार्यवाही साठी निवेदनाच्या प्रति मुख्यमंत्री.उपमुख्यमंत्री,जलसंपदा मंत्री, जिल्हाधिकारी यांना दिल्या आहेत.
करमाळा: प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा वीजपुरवठा सातत्याने खंडित करणे आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज वीज…
करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…
करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…
करमाळा प्रतिनिधी — गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव म्हणून साजरा न करता त्याला सामाजिक बांधिलकीची…
करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…
* करमाळा प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…