प्रतिनिधी वाशिंबे.
युती सरकारच्या काळात स्व. दिगंबरराव बागल यांच्या प्रयत्नाने साडेदहा हजार हेक्टर क्षेत्र ओलीताखाली आणनार्या दहीगाव ऊपसा सिंचन योजनेला मंजुरी मिळून प्रत्यक्ष कामास सुरवात झाली.त्यामुळे या योजनेला स्व. दिगंबरराव बागल यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी बागल गटाचे पश्चिम भागातील युवकनेते गणेश झोळ यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
झोळ यांनी सांगितले की करमाळा तालुक्यातील पुर्व भागातील दुष्काळ हटविण्यासाठी स्व.बागल मामांनी युती सरकारच्या काळात मंत्री पद नाकारुन माझ्या तालुक्यातील शेतकर्यांसाठी दहीगाव ऊपसा सिंचन योजनेला मंजूरी द्यावी अशी आग्रही मागणी तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या कडे केली होती.या योजनेचे महत्त्व जाणून तत्कालीन सरकारने या योजनेला मंजूरी देऊन निधी उपलब्ध केला. स्व.बागलमामा व शामलताई बागल यांच्या कार्यकाळात या योजनेच नव्वद टक्के काम पूर्ण झाले.त्यामुळे बागल मामांचे या योजनेस मोठे योगदान आहे.त्यामुळे या योजनेस त्यांचे नाव देने स्वागतहार्य आहे.तालुक्यातील सर्व पक्षीय नेते याचे स्वागत करतील.
कार्यवाही साठी निवेदनाच्या प्रति मुख्यमंत्री.उपमुख्यमंत्री,जलसंपदा मंत्री, जिल्हाधिकारी यांना दिल्या आहेत.
" करमाळा प्रतिनिधी : आजच्या धावपळीच्या युगात वाढदिवस साजरा करण्यासाठी मोठमोठे कार्यक्रम, केक कापणे, फटाक्यांची…
करमाळा, प्रतिनिधी : करमाळा पोस्ट ऑफिसमध्ये १३ जुनं रोजी आधार मेळावा आयोजित केला असुन नागरिकांनी…
करमाळा प्रतिनिधी केम (ता. करमाळा) : अल्पसंख्यांक व विखुरलेल्या ब्राह्मण समाजाने एकत्र येऊन संघटित व्हावे,…
करमाळा प्रतिनिधी करमाळा, ता. ५ जून : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त करमाळा नगरपरिषदेच्या वतीने महावीर उद्यान…
करमाळा प्रतिनिधी वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या…
करमाळा प्रतिनिधी दौंड तालुक्यातील अग्रगण्य दत्तकला शिक्षण संस्था संचलित "दत्तकला कॉलेज ऑफ फिजिओथेरपी" या…