करमाळा प्रतिनिधी संजय साखरे यंदाच्या खरीप हंगामात नामांकित कंपनीचे बियाणे शेतकऱ्यांनी मोठया प्रमाणावर खरेदी केले. पण त्याची उगवण झालीच नाही. त्यामुळे आधीच अडचणीत असलेल्या शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत आला.
उधार व उसनवारी करून विकत घेतलेलं बियाणे वाया गेले आहे. या संदर्भातील प्रकार राजुरी गावातील शेतकऱ्यांच्या बाबतीत घडला आहे.येथील शेतकऱ्यांनी कांदा व बाजरी चे नामांकित कंपनीचे बियाणे खरेदी केले मात्र ते उगवलेच नाही. जवळ जवळ 15 ते 20 शेतकऱ्यांच्या बाबतीत हा प्रकार घडला आहे. यासंदर्भात राजुरीचे सरपंच डॉ. अमोल दुरंदे यांनी तालुका कृषी अधिकारी सुरज पाटील यांच्याकडे तक्रार केली आहे. ज्या शेतकऱ्यांचे बियाणे उगवले नाही अशा शेतकऱ्यांचा सर्व्ह करून त्याला जबाबदार असण्याऱ्या कंपनी वर गुन्हे दाखल करा संबंधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या ,अशी मागणी सरपंच डॉ. अमोल दुरंदे यांनी केली आहे. मी नामांकित कंपनीचे कांदा बियाणे खरेदी केले होते पण ते उगवले नाही .यासंदर्भात योग्य ती दखल घेऊन संबंधित कंपनी वर गुन्हा दाखल करून मला झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी.
बापूसाहेब टापरे ,शेतकरी, राजुरी.
करमाळा प्रतिनिधी: अखंड हिंदुस्तानचे दैवत म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त करमाळा शहरात…
करमाळा प्रतिनिधी: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जेऊर येथे शिवजन्मोत्सव समितीची स्थापना उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात…
करमाळा प्रतिनिधी बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांना विधान परिषदेवर संधी द्यावी अशी मागणी आपण…
* करमाळा प्रतिनिधी डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे संस्थापक महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा.श्री. राजा माने…
करमाळा प्रतिनिधी विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड यांचे वडील, कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे…
करमाळा प्रतिनिधी: विद्या विकास मंडळचे अध्यक्ष तथा यशवंतराव चव्हाण महाविद्यालयांशी संबंधित नामदेवराव जगताप अध्यापक विद्यालयाचे…