गाव भेट दौऱ्याच्या निमित्ताने मांगी मध्यम प्रकल्पावरती अवलंबून असणाऱ्या विविध गावांमधून रब्बी आवर्तनाचे पाणी सोडण्याची मागणी आमदार शिंदे यांच्याकडे करण्यात आलेली होती ,त्याची दखल घेऊन हे रब्बी आवर्तन सुरू केलेले आहे . बिटरगाव श्री या गावाला पाणी देण्याच्या दृष्टीने नियोजन झालेले असून सायफण टाकण्यासाठी कृष्णा खोरे महामंडळाकडे मागणी केलेली असून त्यांची मंजुरी मिळाल्यानंतर बिटरगाव श्री या गावालाही मांगी मध्यम प्रकल्पाचे पाणी मिळण्याचा मार्ग सुकर होणार आहे.
चौकट –
मांगी मध्यम प्रकल्पाचे उजवा व डावा कालव्याद्वारे रब्बी पिकांसाठी चे आवर्तन आज दि:- १९/०२/२०२३ रोजी सकाळी १०.०० वाजता सोडण्यात आलेले आहे. तरी सदरचे पाणी हे मांगी पोथरे या गावांची मागणी आलेली असल्याने सोडण्यात आलेले आहे. सदरचे पाणी हे पुढील ८ दिवसंकरिता सोडण्यात आलेले आहे. निलज, खांबेवाडी ,करंजे या भागातील लाभधारक शेतकऱ्यांची पाणी मागणी आल्यास आवर्तनाचा कालावधी वाढविला जाईल. तरी सर्व लाभधारक शेतकऱ्यांनी पाणीपट्टी भरून वेळेत मागणी करण्याची नोंद घ्यावी.
श्री संजय अवताडे .
उपअभियंता ,पाटबंधारे विभाग .
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील सिध्दार्थनगर परिसरात घडलेल्या घरफोडी प्रकरणाचा करमाळा पोलिसांनी अल्पावधीत छडा लावत तीन…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…
करमाळा, प्रतिनिधी : शहरातील नागरिकांना स्वच्छ व शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याच्या सामाजिक बांधिलकीतून…
करमाळा प्रतिनिधी शिवसेना श्रमिक राष्ट्रीय कामगार सेना सोलापूर जिल्हाध्यक्ष अमोल जाधव यांच्या 31 मार्च रोजी…
करमाळा प्रतिनिधी अक्कलकोट तालुक्यातील खैराट जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका रेखा सोनकवडे यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांनी अत्यंत…
करमाळा प्रतिनिधी हनुमान जयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराज तरुण मंडळ, सावंत गल्ली यांच्या वतीने गुरुवार…