जीवनात सुख-प्राप्तीसाठी आचरण चांगले ठेवा : नाना महाराज पाडुळे
केतूर ( अभय माने) आपल्या जीवनात सुखाची प्राप्ती व्हावी यासाठी प्रथम आपले आचरण चांगले असायला हवे तरच कीर्तनात प्रबोधन कोणत्या प्रकारची झाली हे कळते आजकाल किती उपदेश करा मात्र काहीही समजत नसल्याची खंत नाना महाराज पाडुळे यांनी केतूर येथील दिगंबर अण्णा माने यांच्या प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रमात केले.यावेळी पंढरीनाथ खाटमोडे, रामराव पाटील, लक्ष्मण महानवर, हनुमंत नवले ,वामनराव मोरे पाटील, खुशालराव साळुंके,पोपटराव राळेभात, पोपट भोसकर, भारत पाटील, गणेश शिंदे, दिनेश काळे,विश्वनाथ वाळुंजकर,प्रकाश खाटमोडे,नवनाथ राऊत, नवनाथ फाळके,राजेंद्र कटारिया अदिसह केतूर, पारेवाडी, दिवेगव्हाण, पोमलवाडी, गुलमोहरवाडी येथील भजनी मंडळ यांचेसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
