करमाळा

आळसुंदे आंदोलकावर दाखल केलेले खोटा गुन्हा मागे घेण्यासाठी गृहमंत्री यांना निवेदन-औंदुबरराजे भोसले

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील नेरले तलाव उजनीच्या पाण्याने पिण्यासाठी भरावा या साठी डी आळसुंदे येथील रस्ता रोको आंदोलकावर – खोटा गुन्हा दाखल केल्यामुळे नागरिकातून न संतापाची लाट आहे .तो गुन्हा मागे घेण्यासाठी  पोलीस प्रमुख सोलापूर, गृहराज्यमंत्री मुंबई, गृहमंत्री तथा मुख्यमंत्री, योना यांना निवेदन देऊन  विनंती करण्यात आली आहे. अशी माहिती नेरले ग्रा.पं. मा सरपंच औदुंबरराजे भोसले यांनी दिली आहे.दहिगाव उपसा सिंचन योजनेतून उजनी ८. धरणाचे वाहून जाणारे पाणी नेरले तला बाबात सोडण्यासाठी अनेक वेळा पत्रव्यवहार ब्त करून देखील पाणी मिळत नसल्यामुळे मी दि-१६/०८/२०२४ रोजी पोलीस स्टेशनकरमाळा, तहसील कार्यालय, दहिगाव योजना कार्यालय, यांना नेरले, आळसुंदे ग्रा. पं. ठराबासह दि. २३/०८/२०२४ पर्यंत पाणी न सोडल्यास रस्ता रोको करण्याचे निवेदन दिले होते. दहिगाव उपसा सिंचन योजनेचे कर्मचारी कांबळे करमाळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे ३० ते पस्तीस पोलीस कर्मचारी उपस्थित होते.कांचळे यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर करमाळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या हस्ते व तालुक्यातील २०० ते २२५ नागरिक परिसरातील सरपंच, उपसरपंच, सदस्य, चेअरमन अशा जबाबदार पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित सव्वा दहा वाजता सुरू झालेले आंदोलन पावणे अकरा वाजतास्थगित करण्यात आले, पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी नागरिकांसोबत चर्चा करून चहा घेऊन आंदोलन शांततेत झाले बद्दल सर्वांचे आभार मानून आंदोलन ठिकाणाहून करमाळाकडे गेले पाच वाजता घुगे यांनी पो-लीस कॉन्स्टेबल दळवी खोटा गुन्हा दाखल केला आहे.     पोलीस स्टेशनने आमचे निवेदन स्वीकारून आम्हाला पोहोच दिली तेच पोलीस एफ आय आर मध्ये म्हणतात, आम्हाला गुप्त माहिती मिळाल्यामुळे आम्ही आळसुंदे फाट्याकडे गेलो असता सदर ४० लोक तिथे बसून आंदोलन करत होतो.हा गुन्हा त्वरित मागे घेऊन पिण्यासाठी पाणी सोडावे अशी मागणी नेरले ग्रा. पं. माजी सरपंचऔदुंबर भोसले यांनी केली आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group