केत्तुर पंचायत समिती गणासाठी सर्वसाधारण जागा- ॲड. अजित विघ्ने यांचे नावाची जोरदार चर्चा
*
करमाळा प्रतिनिधी जिल्हा परिषद पंचायत समिती करीता नुकतेच आरक्षण जाहीर झाले असुन करमाळा तालुक्यातील पश्चिम भागातील कोर्टी जिल्हा परिषद गटातुन केत्तुर व कोर्टी पंचायत समिती गण सुद्धा सर्वसाधारण करिता जाहीर झाले आहेत. जिल्हा परिषद गट सर्वसाधारण महिला करिता राखिव असुन माजी जिल्हा परिषद सदस्या सौ. सवितादेवी राजेभोसले या तिसऱ्यांदा या जागेवर दावा सांगतील तर त्यांचे विरुद्ध जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांचे सुविदय पत्नी यांचे उमेदवारीची चर्चा आहे. कोर्टी आणि केत्तुर पंचायत समिती गण हे देखिल सर्वसाधारण झाले असुन.. बदलत्या राजकीय समिकरणात अनेक राजकीय धुरीण आपले नशिब आजमवणार आहेत. सन-२०१२ साली पंचायत समिती निवडणुक अल्प मतांनी पराभुत झालेले पश्चिम भागातील सामाजिक कार्यकर्ते व राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाचे प्रवक्ते ॲड. अजित विघ्ने( केत्तुर) हे पंचायत समिती केत्तुर गणात दावेदार असलेचे बोलले जात असुन, ते केत्तुर गावचे माजी उपसरपंच होते तर त्यांचे पत्नी देखिल केत्तुर गावच्या माजी सरपंच होत्या.सर्व सामाजिक उपक्रमात त्यांचा सहभाग महत्वाचा असतो. केत्तुर -१ ते केत्तुर -२ आणि पोमलवाडी ते केत्तुर -२ पुलाचे कामात त्यांनी महत्वपूर्ण भुमिका बजावली असुन पारेवाडी रेल्वे स्टेशनवर एक्सप्रेस गाडयांना थांबा मिळवणे करिता त्यांनी केलेला संघर्ष चर्चेत आहे. याशिवाय केत्तुर व परिसरात सामाजिक, राजकीय माध्यमातुन ते सतत कार्यरत असुन, संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य म्हणुन त्यांनी उत्तम काम केले आहे. ते माजी आमदार संजयमामा शिंदे गटाचे प्रबळ दावेदार असुन, माजी आमदार जयवंतराव जगताप यांचे गटातुन त्यांनी २०१२ साली पंचायत समिती निवडणुक लढवली आहे. त्यांचे माजी आमदार जयवंतराव जगताप, माजी मंत्री दिगंबरराव बागल, शिवसेना नेते शिवाजीराव मांगले, माजी आमदार. नारायण पाटील यांचेशी सलोख्याचे संबध राहीलेले आहेत. त्यांचे मित्र परिवारात सध्या त्यांचे उमेदवारी विषयी प्रचंड चर्चा असून, याबाबत त्यांचेशी संपर्क साधला असता. माजी आमदार संजयमामा व सर्व कार्यकर्त्याशी विचारविनिमय करून केत्तुर पंचायत समिती गणातुन निवडणुक लढविणे विषयी इच्छुक असल्याचे सांगितले. वकीलीचे माध्यमातुनही त्यांचा जनसंपर्क असुन, त्यांचे पाठीशी वाढता जनाधार लक्षात घेता ते केत्तुर पंचायत समिती गणातील प्रबळ दावेदार असल्याची चर्चा आहे.


