महात्मा बसवेश्वर यांच्या विचाराचे आचरण ही काळाची गरज – सौ.संगिता नष्टे
करमाळा प्रतिनिधी महात्मा बसवेश्वर यांनी कर्मकांडाला विरोध करून लिंगायत धर्माची स्थापना करून जनसामान्यांना सहज साधी शिकवण दिली. त्यांची शिकवण सामान्य माणसासाठी आहे. ती सहज साधी आणि सोपी आहे. संसारी माणसाच्या जगण्याचे जीवन तत्त्वज्ञान त्यांनी मांडले.त्याचे विचाराचे आचरण ही काळाची गरज आहे असे मत भाजप महिला आघाडीच्या शहराध्यक्षा सौ.संगिता नष्टे यांनी व्यक्त केले.महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की महात्मा बसवेश्वर घरोघरी जात. शरणूशरणार्थी करत.कष्टकरी, दीनदलित, आदिवासी, अठरा आलुतेदार, बारा बलुतेदार, यांना बसवण्णा एकत्र केले. त्यांना सहज साधे जीवन तत्त्वज्ञान सांगितले व एकाच देवाची इष्टलिंगाची साधना करा. देहच देवालय आहे. एकत्र या चर्चा करा. सुसंवाद करा. स्त्रियांना समान अधिकार द्या. पंचसूतके पाहू नका. दलितांना समान संधी द्या. जातीभेद, वर्णभेद, कोंबडे-बकरे कापू नका. स्वकष्टावर जगा. भिक्षा मागून खाऊ नका. काम कष्ट करा. कायकात कैलास आहे. दासोह समाजसेवा आहे. पर्यावरण रक्षण करा. दगडधोंडे पुजू नका. पुरोहिताच्याहस्ते देवपूजा करू नका. . स्वतामधील दोष दूर करा. कर्मकांड दूर करा. स्वतःची स्तुती करू नका अशी सहज साधी शिकवण बसवण्णांनी देऊन समाजाला एक नवी दिशा दिली आहे. यावेळी सौ.मिनाक्षी गुंज़ेगावकर,सुजाता थोरात, श्रीमती राजश्री खाडे ,सौ.मेघा कांबळे,सौ.दुर्गा राजमाने,सौ.अनुराधा राजमाने,सौ.रोहिणी परदेशी यांच्यासह महिला भगिनी उपस्थित होत्या.
