Sunday, September 20, 2026
Latest:
Uncategorized

मकाई साखर कारखाना कामगारांच्या मागण्या मान्य झाल्यानंतर योग्य निर्णय घेणार-महेंद्र देशमुख

करमाळा प्रतिनिधी  मकई कारखान्याचे कामगार ,चेअरमन, संचालक मंडळयांच्यामध्ये चर्चा झाली त्यामध्ये कामगारांनी आपल्याला 25% मान्य नसून आपली 100 टक्के पगाराची मागची मागणीमागे घेत 60 टक्के पगार एक रकमी व उर्वरित 40 टक्के पगार हे टप्प्याटप्प्याने द्यावेत ही मागणी मांडली व संचालक मंडळी यावरती आपल्याला सोमवारी वरिष्ठांशी चर्चा करून सर्वसमावेश योग्य निर्णय घेऊ असे सांगितले परंतु त्यानंत त्यामुळे पुढील प्रतिक्रिया कामगार प्रतिनिधींनी दिली   विद्यमान संचालक मंडळाने कामगारांबरोबर चर्चा केली असून सोमवारी तुम्हाला योग्य निर्णय घेणार असल्याचे असे मत मकाईचे कामगार प्रतिनिधी महेंद्र देशमुख यांनी व्यक्त केले आहे.याबाबत बोलताना त्यांनी सांगितले की कारखानाबाबत विद्यमान संचालक मंडळाकडून शेतकरी सभासद व कामगारांची दिशाभूल केली जात आहे.यांच्यावर विश्वास ठेवणार खरंच यांना कारखाना चालू करायचा असेल असं दिसत नाही कारण मार्चमध्ये कारखान्याच्या खात्यावर पैसे आलेत आज चार महिने झाले चालू करण्याच्या दृष्टीने एकही काम कारखान्यात झालेले नाही . शेतकऱ्यांचे बिल आपण वेळेत नाही .कामगारांचे पगार दिले नाहीत ,थकीत भविष्य निधी रक्कम ही इतके दिवस कारखान्याच्या खात्यावर पैसे असून देखील भरलेली नाही .शेतकरी ऊस कसा देणार संचालक मंडळावर विश्वास कसा ठेवणार कारखान्यात चार महिने झाले पैसे येऊन फक्त झाडू मारायचं काम चालू आहे जरा सभासदांनी कारखान्यावर चक्कर मारून याव हो आम्ही बागल पार्टीचे आहोत आज आमच्यावर अन्याय होतोय कुणाला न्याय मागणार कामगारांनी दिवाळी साजरी न करता काम केले आहे बाकीचे कारखाने कामगारांना दोन दोन पगार बोनस देत होते आणि आमचा पगारही झाला नाही आशा परिस्थिती आम्ही कधीच प्रशासनास त्रास दिला नाही आणि आज पैसे आले असताना आमचे पैसे देत नाहीत नाहीत. बोलण्यासारखं खूप काय आहे सोमवारची वेळ आपण दिली आहे आम्ही त्याची वाट बघत असून सोमवारी कामगारांचे तोंड गोड करावे  मंग आम्ही कारखाना मोठ्या आनंदाने जोमाने चालवणार असल्याचे‌ मत कामगार प्रतिनिधी महेंद्र देशमुख यांनी सांगितले आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!