माजी आमदार जयवंतराव जगताप यांचेसह तिघांची निर्दोष मुक्तता
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथे ऑक्टोंबर २०१८ मधे जि.प सदस्या सौ .राणी वारे यांनी दाखल केलेल्या गुन्ह्यामधून माजी आमदार जयवंतराव जगताप यांचेसह नगराध्यक्ष वैभव जगताप व जयराज चिवटे यांची करमाळा न्यायालयाच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती एम पी इखे यांनी निर्दोष मुक्तता केली आहे .करमाळा बाजार समितीच्या सभापती पदी निवडी दिवशी घडलेल्या पेचप्रसंगातून ३ ऑक्टोंबर २०१८ रोजी सौ .राणी संतोष वारे यांनी दाखल केलेल्या फिर्यादीवरून माजी आमदार जयवंतराव जगताप, नगराध्यक्ष वैभव जगताप व जयराज चिवटे यांच्या विरोधात भारतीय दंड संहीता कलम ४५२,१४३,१४७,१४९,५०४ व ५०६ अन्वये गुन्हा दाखल करणेत आला होता . सदर प्रकरणी पोलिसांनी तपास करून संशयितां विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले . या मधे साक्षी, पुरावे, जबाब व सुनावणी झालेनंतर संशयितांचे विधिज्ञ ॲड कमलाकर वीर यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरीत करमाळा न्यायालयातील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी श्रीमती एम पी इखे यांनी माजी आमदार जयवंतराव जगताप, नगराध्यक्ष वैभव जगताप व जयराज चिवटे यांना सदरच्या गुन्ह्यातून निर्दोष मुक्त केले आहे. यामधे माजी आमदार जगताप व अन्य संशयितांच्या वतीने ॲड कमलाकर वीर, सरकारच्या वतीने ॲड सचिन लुणावत यांनी काम पाहीले . काही दिवसांपूर्वीच याच दिवशी दाखल झालेल्या जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणेसारख्या दुसऱ्या गुन्ह्यातून बार्शी येथील सत्र न्यायाधीश जे सी जगदाळे यांनी माजी आमदार जगताप व अन्य सहा जणांना दोषमुक्त केले होते . दरम्यान राजकीय सत्तासंघर्ष व वैमनस्यातून लोकप्रतिनीधीं वरच जर अशा प्रकारचे खोटे गुन्हे दाखल होत असतील तर सर्वसामान्यांची परिस्थिती काय? अशी देखील सामान्य नागरीकांमधे दबक्या आवाजात चर्चा आहे . याबाबत सर्वच राजकीय पक्ष व गटातटाच्या नेते व कार्यकर्त्यांनी गांभिर्यांनी विचार करण्याची गरज आहे अन्यथा या घटनांचा सामाजीक स्वास्थ्यावर अनिष्ट परिणाम होवून याचे दुष्परीणाम सर्वांनाच भोगावे लागणार असल्याची देखील जनतेत चर्चा आहे . दरम्यान या न्याय निर्णयांमुळे जगताप समर्थकांमधे आनंदाचे वातावरण पसरले आहे .
