Tuesday, April 22, 2025
Latest:
Uncategorized

चैतन्याज् ॲकडमी मध्ये यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न*

 

▶️ नीट मध्ये 500 मार्क्सच्या वरती 35 विद्यार्थी.
▶️ जेईई ॲडव्हान्स व मेन्स मध्ये 20 विद्यार्थ्यांचे IIT व NIT मध्ये सिलेक्शन
▶️ एमएचटी-सीईटी मध्ये 25 विद्यार्थ्यांना 97% च्या वरती मार्क्स.

बारामती प्रतिनिधी

चैतन्याज ॲकडमी व चैतन्याज् इंटरनॅशनल स्कूल मधील नीट,जेईई-ॲडव्हान्स, जेईई-मेन्स तसेच एमएचटी-सीईटी मध्ये उज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा गुणगौरव सोहळा घेऊन त्यांचा सन्मान करण्यात आला,

या प्रसंगी सदर कार्यक्रमासाठी सर्व गुणवंत विद्यार्थी व त्यांचे पालक उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वलन करुन करण्यात आली त्यानंतर स्वागतपर प्रास्ताविक देशपांडे सर यांनी केले व त्यांनी आपल्या प्रास्ताविकात म्हटले कि, विद्यार्थ्यांला स्वतः चा सर्वांगीण विकास व प्रगती करायची असेल तर त्याने परिश्रम घेऊन अभ्यास केला पाहिजेत व शिक्षकांचे वेळोवेळी मार्गदर्शन घेतले पाहिजे,
कार्यक्रमाच्या मध्यांतरात सर्व गुणवान विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला व काहि विद्यार्थी,शिक्षक व पालकांनी आपली मनोगते व्यक्त केली,

सदर कार्यक्रमामध्ये सर्व गुणवंत विद्यार्थी व त्यांच्या पालकांच्या चेह-यावर समाधान व आनंद दिसुन येत होते व त्यांनी आपल्या भाषणातून ते समाधान व्यक्त केले. प्रमुख पाहुणे म्हणुन या गुणवंत विद्यार्थ्यांना शिकवणारे व त्यांचे आयुष्य घडवणारे सर्व शिक्षक होते व सर्व शिक्षकांच्या हातुन या गुणवंत विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा गुणगौरव करण्यात आला,

शिक्षकांमध्ये नटवर सर, कल्याण सर,प्रतिक सर, दिपक सर,यांची भाषणे झाली सर्वांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व पुढिल वाटचालीस शुभेच्छा दिल्या,
कार्यक्रमाच्या शेवटी अध्यक्षिय भाषण श्री.आशिषकुमार खञी सर यांचे झाले त्यांनी आपल्या भाषणातून सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले व काही जुने अनुभव व्यक्त केले व बारामतीमध्ये नीट मध्ये 700 मार्क्सचा पहिला विद्यार्थी हा चैतन्याज् ॲकडमीचा असेल अशा भावना व्यक्त केल्या. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन प्रा.प्रविण अंबोधरे सर यांनी केले.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group