तुळशीविवाह हिंदु सस्कृंतीमधील आनंदाचा दिवाळी सण
केत्तूर (अभय माने) तुळशी विवाह शनिवार (दि.5 ) पासून प्रारंभ झाला आहे ते विवाह बुधवार (दि. 9 ) पर्यंत चालणार आहेत .तुलसी विवाह गोरज मुहूर्तावर म्हणजेच सायंकाळी केला जातो.लग्न सोहळा सोहळ्याप्रमाणे तुलसी विवाह पार पाडले जातात. शेजारीपाजारी यांना या विवाह सोहळ्यासाठी आवर्जून बोलावून दिवाळीचा फराळ नैवेद्य म्हणून दिला जातो.तुलसी विवाहानंतर दिवाळी संपली असे मानले जाते .
तुळशी विवाहासाठी ऊस, तसेच बोर, आवळा, पेरू ,सिताफळ, आंब्याची , पूजेचे साहित्य,वस्त्र हळदी कुंकू, फुलांच्या तसेच लाईटच्या माळा यांनी आदि साहित्य बाजारपेठेत विक्रीसाठी आले आहे.तुळशी विवाहासाठी तुळशी वृंदावन आकर्षितपणे रंगविले जाते तसेच वस्त्र व पूजा साहित्यांनी तुळस सजविली जाते.तुलसी विवाहानंतर फटाक्याची आताषबाजी होताना दिसत आहे.
छायाचित्र :तुलसी विवाह (संग्रहित)
