छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम फाउंडेशन व मुस्लिम समाजाच्या वतीने श्रीराम प्रतिष्ठानच्या अन्नपुर्णा योजनेतील ज्येष्ठ नागरिकांना अन्नदान
करमाळा प्रतिनिधी तमाम हिंदुस्थान जनतेचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम फाउंडेशन करमाळा व करमाळा मुस्लिम समाज यांच्या वतीने श्रीराम प्रतिष्ठान येथे निराधार वृद्ध अशा जेष्ठ नागरिक यांना अन्नदान वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी भारतीय जनता पार्टी करमाळा तालुका अध्यक्ष व सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य मा. गणेश भाऊ चिवटे, करमाळा मुस्लिम समाजातील समाजसुधारक व विचारवंत करमाळा अर्बन बँकेचे संचालक मा. हाजी कलीम काझी ( सर ) अध्यक्ष यांच्या शुभहस्ते व प्रमुख पाहुणे करमाळा शहरातील भाजपा उप अध्यक्ष पै. अफसर जाधव, सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी चे उपाध्यक्ष मा. अशपाक भाई जमादार, उद्योजक रमेश भाऊ वीर , रहेनुमा चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव सुरज भाई शेख, करमाळा जामा मस्जिद चे विश्वस्त जमीर भाई सय्यद, भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम फाउंडेशन चे उपाध्यक्ष जहाँगीर बेग, सचिव पिंटु शेठ बेग यांच्या उपस्थितीत पार पडले यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना गणेश भाऊ चिवटे यांनी सांगितले की तमाम हिंदुस्थान जनतेचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्व समाजातील लोकांना बरोबर घेऊन स्वराज्य ची मुहुर्तमेढ उभी करून असंख्य मावळ्यांच्या साक्षीने मोगल राजवट संपुष्टात आणुन महाराष्ट्र व भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले . माझी राजकीय व सामाजिक कार्याची सुरुवात देखील आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना आदर्श मानून त्यांचे विचार व आचरण आपल्या कृतीतून दाखवून देण्याचा नेहमी प्रयत्न केला आहे.आज सर्व समाजातील लोकांना बरोबर घेऊनच मी काम करत आहे व नेहमी करणार आहे यासाठी आपल्या सर्वांच्या सहकार्याची गरज आहे. करमाळा मुस्लिम समाजातील समाजसुधारक व विचारवंत मा. कलिम काझी (सर) यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की आमच्या सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचारच भारतातील व महाराष्ट्रातील सामाजिक ऐक्य व एकात्मता टिकवून ठेवण्यासाठी मार्गदर्शक तत्व ठरतील. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या न्याय्य दानाने, सामाजिक ऐक्याने, दुरदृष्टीने, सर्व धर्म समभाव व मानवतावादी विचार ठेवून जगाला आपल्या नेतृत्वाचा आदर्श घालून दिला आहे. सर्व समाजातील लोकांनी जीवन जगताना एकमेकांचा आदरभाव ठेवून सामाजिक ऐक्याला तडा जाणार नाही याची सार्वजनिक जीवन जगताना भान ठेवावे असे आवाहन केले आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुस्लिम समाजातील युवक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी आभार पिंटु शेठ बेग यांनी मानले.
