पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बातचीतचे 100 व्या भागाकडे वाटचाल
करमाळा प्रतिनिधी 98 व्या मन की बात कार्यक्रम द्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांनी देशवासियांना धन्यवाद दिले तुमच्या सर्वाच्या सहकार्याने मन की बात 100 वा भाग लवकरच संपन्न होत आहे.ज्यावेळेस पासून मन की बात कार्यक्रम सुरू केले त्यावेळेस पासून विविध राज्यातील विविध परंपरा, विविध विषयावर संवाद व चर्चा झाली समाजाची शक्ती म्हणजे देशाची शक्ती याचा अनुभव आपण वेगवेगळ्या मन की बात द्वारे घेतला आहे अशी भावना त्यांनी व्यक्त केली .
आजच्या थेट मन की बात प्रसारणाचा लाभ करमाळ्यातील मथुरा नगरामध्ये घेतला यावेळी भाजपाचे जेष्ठ नेते प्रदीप देवी, संजय गांधी योजनेचे नरेंद्रसिंह ठाकूर, महेश वैद्य, सचिन चव्हाण ,गणेश रेगुडे, योगेश बारटक्के आदी उपस्थित होते.मन की बात कार्यक्रमांमध्ये ज्यावेळी देशी खेळणी प्रसारित झाल्यानंतर देशी खेळणीला देशात नव्हे तर विदेशातील मागणी वाढू लागली तसेच वेगवेगळ्या प्रकारची खेळ याचीही माहिती होऊ लागली अनेकजण स्टोरी टेलींगकडे आकर्षित होऊ लागले आहेत
सरदार वल्लभाई पटेल यांच्या एकतादिना निमित्त आयोजित केलेल्या स्पर्धेमध्ये देशभक्ती गीत, रांगोळी, अंगाई गीत स्पर्धा यामध्ये 700 पेक्षा अधिक जिल्ह्यातील स्पर्धेकानी ( पाच लाख पेक्षा अधिक ) सहभाग घेतला यामध्ये वीस पेशा अधिक भाषेमधील स्पर्धक सहभागी झाले होते या स्पर्धेत देशवासियांनी स्पर्धेत सहभाग घ्यावा यासाठी गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनीही ट्युुट केले होते याचीही आठवण त्यांनी सांगितली ,अंगाई गीत रायटिंग स्पर्धेमध्ये कन्नड भाषेतील प्रथम पुरस्कार कर्नाटक चाामराजनगर येथील बी. एम .मंजुनाथन यांच्या मलगुुकंदा तर नृत्याचा करकटम शैैलीचा व्ही दुर्गादेवी, तेलंगणा येथील पेरी उडीसा महोत्सवाचे आयोजन करणारे राजकुमार नायक ,सायकॉन येथील सुुरचंंद्रा सिंग यांच्या मैयतीयपुंग या इन्स्ट्रुमेंट ला मिळाला तसेच म्युझिक क्षेत्रामधील वेगवेगळ्या स्थाानिक बोली भाषेतील म्युझिक गायक उत्तराखंड येथील पुरणसिंग या दिव्यांग कलाकाराला पुरस्कार मिळाला तर द्वितीीय पुरस्कार कामरूप आसाम येथील दिनेश गोवाला यांच्या अंगाईगीताला मिळाला रांगोळी मधील पुरस्कार पंजाब येथील कमल कुमारजी यांच्या भगतसिंग व सुभाषचंद्र बोस यांच्या रांगोळीस तसेच महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील सचिन नरेंद्र आवसरे यांच्या जालियनवाला बाग तसेच शहीद उदमसिंह तर गोवा येथील गुरुदत्त वांटेकर यांच्या गांधीजी, पुडीचेरी येथील मलाथी सेव्हलमृ आजादी सेनानी तसेच देशभक्तीपर गीता मध्ये प्रथम पुरस्कार टी विजयदुर्गा आंध्र प्रदेश यांच्या तेलगू येथील नरसिंह रेड्डी स्वातंत्र्य सेनानी यांच्या गौरव गिताला
” ई संजीवनी अप “द्वारे डॉक्टर मदन मनीजी यांनी केली टेेली कन्सल्टन्सी व्हिडिओ कॉल द्वारे सिक्किम सारख्या घनदाट जंगलामध्ये लोकांना आरोग्य सुविधा कशा देतात सुविधा सोप्या कशा झाल्यात याबाबत माहिती दिली
यूपीआय बाबत त्यांनी भारत व सिंगापूर या देशातील ऍप द्वारे पैशाचे व्यवहार ,पैसे ट्रान्सफर सुविधा डिजिटल क्रांतीचे पाऊल याबाबत उदाहरण दिले
तसेच अमेरिकेत वास्तव असणारे कंचन बॅनर्जी यांनी पश्चिम बंगाल येथे 700 वर्षांपूर्वी बंद झालेला महोत्सव सुरू केला त्रिवेणी कुंभ या महोत्सव मध्ये आठ लाख पेक्षा जास्त भाविकांनी या कुंभमेळ्यात भाग घेतला त्याचे उदाहरण सांगितले तसेच हरियाणातील दुलेरी या गावातील काही युवक एकत्र येऊन त्यांनी स्वच्छता अभियानाद्वारे संपूर्ण शहराचा वेग वेगळ्या भागातील कचरा लाखो टन आतापर्यंत जमा केलेला आहे तसेच उस्ताद बिस्मिल्ला खान पुरस्काराने सुरसिंगार या वाद्याचे जयदीप मुखर्जी यांना पुरस्कार देऊन नुकतेच सन्मानित केले आहे तसेच संग्राम सिंह भंडारे यांच्या वारकरी कीर्तन यांनाही सन्मानित केले आहे होळीच्या शुभेच्छा देऊन त्यांनी 98 व्या मन की बातचा समारोप केला…
