करमाळा

मस्साजोगचे लोकनियुक्त सरपंच कै. संतोष देशमुख परभणी येथील कै. सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा याकरिता प्रा. रामदास झोळसर दशरथ आण्णा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयावर धरणे आंदोलन

करमाळा प्रतिनिधी मस्साजोग जिल्हा बीड येथील लोकनियुक्त सरपंच कै. संतोष देशमुख यांची दिवसाढवळ्या निर्घुण हत्या, तसेच परभणी येथील आंबेडकरी आंदोलनात कै. सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा न्यायालयीन कोठडीत संशयास्पद मृत्यू, या आपल्या पुरोगामी महाराष्ट्र मध्ये झालेल्या घटनांबद्दल निषेध म्हणून करमाळा तहसील कार्यालयासमोर प्रा. रामदास झोळ सर व मा. दशरथ आण्णा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली भव्य धरणे आंदोलन करण्यात आले. पीडितांच्या कुटुंबीयांना लवकरात लवकर न्याय मिळावा. ही त्यांची प्रमुख मागणी होती. या प्रकरणां बाबत पुढे बोलताना प्रा. रामदास झोळ सर यांनी सांगितले की,
महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व शाहू महाराज यांच्या विचारांनी पावन असलेल्या महाराष्ट्रात अशा घटना होणे हे न्यायव्यवस्थेला धरून नाही. दोषींना ताबडतोब अटक करून कडक कारवाई व्हावी. अशीही त्यांनी मागणी केली. नायब तहसीलदार मा.
लोकरे साहेब यांच्या आश्वासनांनंतर धरणे आंदोलन संपुष्टात करण्यात आले. त्यावेळी हरिभाऊ मंगवडे, गणेश मंगवडे, संजय जगताप, ज्ञानेश्वर शिंदे, दीपक शिंदे, अमोल घुमरे, हनुमंत मांढरे-पाटील, रमेश अण्णा कांबळे, औदुंबर भोसले-पाटील, दीपक शिंदे, अमोल घुमरे, सुदर्शन शेळके, तात्यासाहेब सरडे, भीमराव ननवरे, सुहास काळे, औदुंबरराजे राजे भोसले, प्रवीण सुरवसे, भाऊसाहेब शिंदे, कांतीलाल शिंदे, श्रीराम भोरे, ऋषिकेश कांबळे, भाऊसाहेब पवार व परिसरातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group