करमाळा

राज्यात केंद्रात आपले सरकार असुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री गोरे यांच्या नेतृत्वाखाली वांगी परिसरातील मूलभूत विकासाला गती मिळणार – विलासराव घुमरे सर

. करमाळा प्रतिनिधी.
राज्यात केंद्र व राज्यात आपलेच सरकार असून कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच ग्रामविकास व पंचायत राज मंत्री व सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वांगी व परिसरातील मूलभूत विकासकामांना गती दिली जाईल, असा विश्वास विद्या विकास महामंडळाचे सचिव व मार्गदर्शक श्री. विलासराव घुमरे यांनी व्यक्त केला.
वांगी येथे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक प्रचाराच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रचाराचा नारळ फोडून औपचारिक प्रारंभ करण्यात आला. कार्यक्रमास स्थानिक पदाधिकारी, उमेदवार व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री. घुमरे पुढे म्हणाले की, रस्ते, वीज, पाणी नियोजन यांसारख्या जनतेच्या दैनंदिन गरजांवर प्राधान्याने उपाययोजना करण्यात येतील. ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी शासन स्तरावरून सकारात्मक निर्णय घेतले जात असून त्याचा थेट लाभ सर्वसामान्य नागरिकांना मिळणार आहे.
भाजपा महिला प्रदेश उपाध्यक्ष रश्मी बागल, माजी आमदार संजय शिंदे तसेच भाजपा युवा नेते दिग्विजय बागल यांच्या नेतृत्वाखाली विकासाचा अजेंडा पुढे नेण्यात येणार असून येत्या ५ तारखेला होणाऱ्या मतदानात कमळ व घड्याळ या चिन्हासमोरील अधिकृत उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
कार्यक्रमात शहाजी दादा देशमुख, कल्याण सरडे, चंद्रहास बापू निमगिरे, शिवाजीराव बंडगर, उमेदवार सोनालीताई नितीन तकीक व डॉ. विजय रोकडे यांनी मनोगत व्यक्त केले. विकासासाठी सर्व घटकांनी एकत्र येण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्जुन आबा तकीक यांनी केले, तर नितीन तकीक यांनी उपस्थितांचे आभार मानले.

error: Don\'t try to copy. Content is protected !!